Wednesday 14 September 2022

GAZAL SAKHICHI EPISODE 12

https://youtu.be/ybKsOT4uN2w
मित्रांनो कधी कधी काळजावर एक घाव खूप खोलवर होतो ,  खूप गहिरा होतो  आणि  त्या घायाळ काळजातून वेदना  पाझरू  लागते .  
कधी कधी  ती मखमली वेदना असते 
तर कधी कधी  ती जीव  जळणारी घोर  यातना  असते .
मित्रांनो गझल म्हणजेच  मखमली वेदना 
मित्रांनो गझल म्हणजेच  विरहात सोसलेल्या यातना .
Dear friends kindly like share and subscribe my you tube channel

Wednesday 16 February 2022

संत रोहिदास


आज संत शिरोमणी श्री संत रोहिदास यांची जयंती आहे त्यांचा  जन्म  इ.स.१४१४ साली माघ माघपौर्णिमेला रविवारी झाला होता . म्हणून आज त्यांचा एक दोहा आपल्या समोर सादर करत आहे 

एकै माटी के सब भांडे सबका एको सिरजन हारा ।
' रविदास ' ब्यापै एको घट भीतर, सबकौ एकै घडै कुम्हारा।१

या वरील ओळीत संत श्रेष्ठ श्री. संत रोहिदास म्हणतात की , ज्या प्रमाणे कुंभार एकाच मातीतून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक भांडे तयार करतो त्याच प्रमाणे  ईश्वराने एकाच मातीतून आपल्या सगळ्यांना घडविले आहे .प्राणी, पक्षी ,माणसे ,धरती निसर्ग सागर  याचा निर्मात हा एक दयाळू ईश्वरच आहे आणि तो या सर्वांमधे व्यापला आहे . 
                                                         सतिष अहिरे

Friday 28 January 2022

चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे


चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; -
 नाशिक मध्ये गोदावरीच्या तीरी तील भंडारेश्वर महादेवा शेजारी त्यांच्या घराण्याचं वडिलोपार्जित घर होतं. तिथे २९ जानेवारी १८७१  रोजी त्यांचा जन्म झाला. 
त्यांचा वडिलांचे नाव शिवराम रामकृष्ण आईचे नाव म मणिकर्णिनिकाबाई होते.त्यांना आधी वामाराव आणि नारायणराव हे पुत्र झाले आणि नारायणरावांच्या नंतर वीस वर्षांनी कवी चंद्रशेखर यांचा जन्म झाला. ते शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण होते. 

त्यांचे मराठी शिक्षण दाजी पंतोजी यांच्या गावातील शाळेत झाले आणि नाशिक मधील  सरकारी नंबर ३ या शाळेत झाले. पाचवी इयत्ता मराठीत उत्तीर्ण झाल्यानंतर ते इंग्रजी शिकण्यासाठी  नाशिक हायस्कूलला जाऊ लागले. 

 त्यांच्या कवितालेखनची सुरुवात कशी झाली याचा ही एक  सुंदर किस्सा आहे . ते शाळेला सुट्टी लागल्यानंतर सिन्नरला आपल्या नातेवाईकांकडे गेले होते त्यावेळी सिन्नर हे बागायतदार क्षेत्र होतं तिकडंचा , निसर्ग खूप सुंदर होता, मनाला भावणारा असा होता आणि अशा वातावरणात त्यांचं कवी मन जागं झालं आणि ते गुणगुणायला लागेले आणि त्यांनी आपला  पहिला स्तोत्र हा त्यावेळी लिहून काढला  तो असा होता. 

 '  नारायणा शरण त्या करुणालया मी ' 

त्यांनी ते स्तोत्र त्यांचे काका म्हणजेच गोपूतात्यां यांना वाचून दाखवले. गोपूतात्यांना ते  खूप आवडले आणि त्यांनी कवी चंद्रशेखर यांच्या पाठीवरती शाब्बासकीचा हात फिरवला आणि तू नक्की कधी होशील अशी शाब्बासकी दिली.

पुढे त्यांचे इंग्रजी शिक्षण बडोदा हायस्कूल आणि त्यानंतर विश्राम बागेतील पुणे हायस्कूल येथे झाले. 

असेच निवांत बसले होते तेव्हा  वसंताची सुरुवात झाले होते कोकिळेचे स्वर  तेव्हा सर्वत्र घुमायला लागले होते  आणि तो कोकिळेचा स्वर   त्यांच्या मनाला मोहून टाकत होता,  आणि यामुळेच त्यांचं  कविमन पुन्हा जाग  झालं आणि त्यांनी आपली पहिली कविता " कोकील " ही रचली  आणि ती १८ मे १८९५ रोजी एका अंकात  प्रकाशितही झाली .

त्यांचे शिक्षण झाल्यावर तिथे पुढे नोकरीधंद्या निमित्त अमदाबाद ला गेले.पण तिकडे त्यांचे कामात मन लागत नव्हते ते कवितेच्या विश्वास हरवत चाललेले होते. त निमूटपणे अमदाबाड हून बडोद्याला आले व त्यांचे बंधू नारायणराव यांच्या कडे राहिले. त्यांना बर्‍याचशा भाषांचे ज्ञान होतं त्यामुळे तिथे त्यांना सरकारी ऑफिसात कारकुनाची नोकरी मिळाली. प्रथम त्यांनी दिवाण कचेरीत एक वर्ष हंगामी कारकुनाचे काम केले आणि नंतर लगेच त्यांना राज्यातील चीफ मेडिकल ऑफिसर यांनी आपल्या कचेरीत बोलून घेतले. 
याच वेळी त्यांचा कविवर्य दत्तात्रेय कोंडो यांच्याशी परिचय घडून आला . आणि त्यांच्या साहित्यिक बरकतीचा काळ सुरू झाला. 

चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशी कविता त्यांनी लिहिली. इंग्रजी कवितेचे वाचनमनन त्यांनी केलेले असले, तरी तिच्यातील स्वच्छंदतावादी संप्रदायाचे त्यांना आकर्षण नव्हते मात्र मिल्टनसारखा विदग्ध, व्यासंगी कवी त्यांना जवळचा वाटत होता. कवितेतून आत्मलेखन करणे त्यांना मान्य नव्हते. कवितेने ज्ञान आणि रस ह्यांचा एकात्म अनुभव द्यावा, अशी त्यांची काव्यविषयक भूमिका होती आणि ह्या भूमिकेतून त्यांनी काव्यकलेची आजीव आणि निष्ठापूर्वक उपासना केली. पंडीत कवींचे अलीकडच्या काळातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी, असे त्यांना यथार्थपणे म्हटले जाते. ‘गोदागौरव’ आणि ‘कविता-रति’ ह्या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कविता. ‘गोदागौरवा’चे नादमाधुर्य जयदेवाच्या गीतगोविंदाची स्मृती करून देते. ह्या दोन्ही कवितांतील— विशेषतः ‘कविता-रति’ मधील –आत्मपरता चंद्रशेखरांच्या कवितेत अपवादभूत आणि म्हणून विशेष लक्षणीय आहे. कवी म्हणून त्यांची कीर्ती प्रामुख्याने चंद्रिका (१९३२) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहावर अधिष्ठित आहे. ह्या संग्रहास लाभलेल्या यशामुळेच बडोदे संस्थानाचे राजकविपद त्यांना मिळाले.

त्यांनी काही उत्कृष्ट रूपांतरेही केली. मिल्टनच्या इल् पेन्सरोझो  आणि ल’ आलेग्रो  ह्या काव्यांची अनुक्रमे ‘चिंतोपंत उदास’ आणि ‘रंगराव हर्षे’ ह्या नावांनी त्यांनी केलेली रूपांतरे, तसेच ‘काय हो चमत्कार’ हे एका इंग्रजी बॅलडचे रूपांतर ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरतात.

ह्यांशिवाय ‘उगडं गुपित्’ व किस्मतपूरचा जमीनदार (१९३६) ही स्वतंत्र कथाकाव्ये त्यांनी लिहिली असली, तरी ती फारशी मान्यता पावली नाहीत.
त्यांची साहित्यिक संपदा ही पुढील प्रमाणे आहेत 
अर्वाचीन कविता
उघडं गुपित (कथाकाव्य)
कविता रति
किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
गोदागौरव (स्तोत्रकाव्य)
चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२)
चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
धनगर (दीर्घकाव्य)
रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)
पुढे त्यांची एक रचना आणि त्याचे  रसग्रहण हे आपल्या समोर मी देत आहे . 

         समरमहिमा
         
         ही कविता कवीने रणभूमी ही विरपत्नी साठी उद्देशून बोलत आहे या अर्थाने लिहिली आहे . कवी चंद्रशेखर आपल्या पहिल्या ओळीत म्हणतात की 

आली तटस्थ झाली, थरके अधरोष्ठ, आंसवें गळती ।
रणदेवताही झाली त्या वीरस्त्रीसमोर विरघळती ।।१।।

 याचा ओळींचा अर्थ असा होतो की  ती  वीर पत्नी तटस्थपणे उभी राहिली आहे . तिचे ओठ थरथर कापतात आणि आता तिची  आसवे ही  गळायला लागलेली आहेत.  ही रण देवताही त्या वीर स्त्रीच्या दुःखामुळे आता स्वतःही दुःखी झाली आहे . 

'बाई' तिला म्हणे ती, पदराने टिपुनी नयनवारीतें ।
'सांगू काय तुला मी आले कामास कारभारी ते! ।।२।।

 या ओळींचा अर्थ असा आहे की आता रण देवताही त्या वीर पत्नीच्या संत्वणासाठी बाकी आलेली आहे आपल्या पदराने ते तिचे अश्रू टिपून घेत आहे. पण रण देवतेला आता काळात नहीये की त्या वीर पत्नीला कसं सांगावं की तिचे स्वामी  आपलं कर्तव्य निभवताना त्यांना वीर मरण आलेल आहे.

पंचाननापरी गे परचक्रावरी तुटोनी तो पडला ।
असहाय! काय करितो? लढला, लढला, थकोनियां पडला! ।।३।।
या ओळींचा आर्थ असा आहे की  वीर शत्रूवर सिन्हा सारखा  तुटून पडला पण रणांगणात शेवटी तो खूप थकला आणि शेवटी असहाय झाला  आणि   लढाता लढता त थकले  जमिनीवर पडला 

पडला गे पडला तो वीर रणी धूलिमाजी पडलाहे ।
कज्जलमिश्रित अश्रू हीच तया तूं तिलांजली वाहे ।।४।।

या ओळीचा आर्थ असा आहे की तो शुर वीर आता निपचित होवून जमिनीवर पडलेला आहे .. आणि तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या काजळ मिश्रित अश्रू हेच तिने  त्यांना वाहिलेली तिलांजली आहे 

विद्युत्प्राय सभोती चमकत असता सुतीव्र तरवारी ।
त्यांतुनी अचल उभा तो, पर्वतगर्व स्वनिश्चयें हारी ।। ५।।

या ओळींचा अर्थ असा आहे की  विजेच्या सारख्या   लखलखनाऱ्या तलवारी  ससभोवतली  चमकत असताना ही तो वीर  निर्धास्त  त्यांच्या समोर उभा राहिला होता त्याला तसं पाहून पर्वताचा गर्व ही त्याच्या पुढे फिका पडला होता. 

जे संग्रामधुरंधर रिपुसंहारार्थ करिती घोर रण ।
त्या वीरांते यावे, तैसे सन्मान्य यास ये मरण ।।६।।

या ओळींचा अर्थ आसा आहे की   रणांगणात  शत्रुच्या संहारासाठी तो वीरा प्रमाणे  लढला आहे . आणि लढता लढता त्याला वीर मरण आलं आहे . 

तद्वेश केशरी तो, झालाहे चिवट मेणकापडसा ।
चढुनी पुटे रुधिराची नुमजे होता तयास रंग कसा ।।७।।

 या ओळींचा अर्थ असा आहे की त्याचा वेश हा केसरी झालं आहे. त्याचे कपडे मेणा सारखे रक्ताने चिकट झाले आहेत. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे एवढे डाग पडले आहेत ही त्या कपड्यांचा मूळ रंग आता ओळखता येत नाही ये.

जेथे देह तयाचा गळला, तेथे तयास तुटवोनी ।
राऊत बहू पडले, शतावधी अरिशिरांस उडवोनी ।। ८।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की शेकडो शत्रूंचे मुंडके उडवल्या नंतर त्यांचा देह शेवटी रणांगणात निपचीत पडला.

अपुल्या प्रिय देशास्तव वीर जसा पाहिजे रणी लढला ।
लढला तसाच तोही, पाहुनी शतशें रिपू स्वयें पडला ।।९।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की तो वीर आपल्या प्रिय देशासाठी विरा प्रमाणे लढला जरी त्याच्या समोर शेकडो शत्रू होते. 


गृंध्रादिक आकाशी घिरट्या जे घालिती प्रभाती ते ।
त्वप्रियजनदेहावरी करितिल उदईक मेजवानीते ।।१०।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की आज आकाशात जे गिधाडे घिरक्या घालत आहेत ते उद्या  युद्धात शहीद झालेले जे वीर होते हे या विरास प्रिय होते पण आता ती गिधाडे त्या  वीरांच्या  देहाचे लागते लचके अन लचके तोडून मेजवानी करतील 

हे वीरवल्लभे तूं संतत करशील शोक बहू त्याचा
कवी गातील तयाचा महिमा तत्प्राणहारिं समराचा ।। ११।।

या ओळींचा अर्थ असा आहे की हे वीर पत्नी तू त्या विराचा रोज  शोक करशील पण  त्यांची महिमा कवी आपल्या कवितेतून सादर करतील त्यांनी दिलेले  बलिदान वाया जाणार नाही त्यांचं कर्तृत्व हे  अखंड जिवंत राहील 

   या कवितेत कवी चंद्रशेखर यांनी किती सुंदर पने  रणभूमीचे आणि त्या रणभूमी साठी लढलेल्या त्या विरचे चित्र रेखाटले आहे.. आपल्या पतीच्या दुःखात चिंब बुडलेल्या वीर पत्नीचे दुःख ही किती सुंदर रित्या मांडलं आहे... किती जिवंत पणा आहे त्याच्या लिखाणात.... आज त्यांची जयंती आहे त्यांना लाख लाख वंदना देतो आणि तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद. ..
  ( सतिष अहिरे ) 

Friday 21 January 2022

माधव ज्युलियन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी आजोळी बडोदा, येथे झाला होता आणि मृत्यू -२९ नोव्हेंबर १९३९ पुण्यामध्ये त्याच्या राहत्या घरी झाला होता. त्यांचं पाळण्यातले नाव 'गजानन' असं होत पण लहान पणी दोन महिन्यांचे असताना ते अखंड रडू लागले म्हणून त्यांच्या आत्या बाईनी त्यांची जोड्याने तुळा केली व घराण्याचा मूळ पुरुष ' महादेव ' हे जुनाट नाव त्यांना ठेवलं. मोठेपणी कॉलेजात गेल्यावर त्यांना ते नाव अवडेनासे झाले आणि १९१२ पासून त्यांनी स्वतःचे नाव बदलून 'माधव ' असे ठेवले आणि तेच नाव पुढे रूढ झाले .
   
    त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला होता.

माधव जूलियन हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधव जूलियन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले .
पण माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

गजल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव जूलियन यांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. तसेच त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

माधव जूलियन यांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

 माधव जूलियन कार्यमग्न असताना आणि यशाच्या शिखरावर असताना अचानक पणे गेले त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता पुण्याच्या स्वतःच्या राहत्या घरी २९ नोव्हेंबर १९३९ च्या रात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यावेळी ते केवळ ४६ वर्षाचे होते.

माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.
स्वप्नभूमी माधव ज्यूलियन : लेखक शंकर केशव कानेटकर
डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन : लेखक दत्तात्रेय नरसिंह गोखले
माधव ज्यूलियन : गंगाधर देवराम खानोलकर

माधव ज्यलियन यांची ग्रंथ संपदा पुढील प्रमाणे आहे.
उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)
काव्यविहार (निधनोत्तर इ.स. १९४७, लेखसंग्रह)
गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
नकुलालङ्कार (इ.स. १९२९, दीर्घकाव्य)
फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)

ते इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते तसेच इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
 इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन.अध्यक्ष होते 
पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
       माधव ज्युलियन यांना केवळ ४६ वर्षाचं आयुष लाभलं त्यातील सुरुवातीचे २४ वर्ष शैक्षणिक काळ यातून वजा करता फक्त २२ वर्ष त्यांच्या साहित्य कर्तुत्वाचे म्हणता येतील. या अल्प काळात त्यांनी केलेली साहित्य निर्मिती ही विपुल व वैविध्यपूर्ण आहे.
    माधव ज्युलियन यांचं काव्य कर्तुत्व फार मोठा आहे. त्यांचे इतर बरेचसे गद्यलेखनही काव्य लेखनाशी संबंधित आहे.
     त्यांचे सर्व जीवन हे त्यांच्या काव्यात व्यक्त झालेले आहेत. त्यांच्या कवितेला कोणाची ही परंपरा नाही , ती स्वतंत्र आहे. तिच्यावर इंग्रजी ,फारसी ,संस्कृत ,गुजराती या भाषेचेही संस्कार आहेत पण त्या भाषेतील काव्याचे अनुकरण नाही. प्रत्येक काव्यात आशय आणि अभिव्यक्ती या पूर्णपणे वेगळ्या आहेत.
     माधव ज्युलियन यांच्या साहित्यात विविधता आहे त्यांनी स्फुट काव्य लिहिली, दीर्घकाव्य लिहिली ,अनेक लेख लिहिले, फारसी मराठी शब्दकोश तयार केला, छंदोरचना हा काव्याची माहिती आणि त्या संबधित वृत्ते आणि त्यांची उदाहरणे याप्रकारे आपल्या माहितीपूर्ण ग्रंथ लिहून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.
   आम्ही आज देखील त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आहोत. गजल शिकत आहोत लिहत आहोत. मराठी साहित्यात गजल हा प्रकार त्यांनी आणला म्हणून आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत... त्यांच्या कर्तुत्वाला लाख लाख सलाम..  
   आज त्यांची एक कविता आणि तिचं रसग्रहण आपल्या समोर देत आहे .

मराठी असे आमुची मायबोली,
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे

मराठी असे आमची मायबोली या कवितेत माधव ज्युलियन याची मराठी विषयीची तळमळ आपल्याला दिसून येते. कवितेतील पहिल्या कडव्यात ते बोलून जातात की मराठी जरी राज भाषा नाही तरी ती आमची माय बोली आहे. आज तिला ते ऐश्वर्य प्राप्त झालेला नाही ते महत्त्व प्राप्त झालेले नाही , तरी मला पूर्णपणे अशी आशा आहे की एक दिवस तिला तिचं महत्त्व तिचं ऐश्वर्य प्राप्त होईल. 
   

जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

या कडव्यात माधव ज्युलियन सांगताय की आज जरी सात खंड आहेत पूर्वी केवळ पाच खंड होती . आणि त्या काळातही इंग्रजीचं वर्चस्व पाचही खंडांमध्ये होतं इंग्रजी भाषाही त्यावेळी श्रीमंतीच्या शिखरावर होती. इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेला तेवढं महत्त्व राहिलं नव्हतं म्हणून कवी ही कळकळीची विनंती करताहेत की आपल्या मायबोलीला असे त्यागु नका. 

जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेलें नवें राष्ट्र हे हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती
हिची जाणुनी योग्यता थोरवी
मराठी असे आमुची मायबोली,
जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी,
हिच्या एक ताटात आम्ही बसूं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असे बोलायचे आहे की जरी आज हिंदी भाषेला देशभर मान्यता प्राप्त झाली असेल. हे जरी नवे हिंदवी राज्य तयार झाले असेल तरीपण जे मनापासून मराठी आहे त्यांच्या मनात आपली मायबोली मराठीही वसते ते जरी भिन्न भिन्न जातीची धर्माचे असो वा पंतांचे असो तरीही आपल्या मायबोली बद्दल त्यांच्या मनात आस्था आहे. आणि आपल्या माय मराठी साठी आम्ही बंधुभाव हृदयात बसवला आहे आणि आपल्या मायबोलीसाठी आ आपापसातले मतभेद विसरून सर्व एकत्र आलेलो आहोत. 

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं,
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी,
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे,
हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असं बोलायचं आहे की आम्ही या माय मराठीचे पुत्र आहोत तिचे पांग आम्ही नक्कीच फेडू आमच्या हृदय मंदिरात फक्त माय मराठीच वसते आम्ही सगळे मिळून तिला या जगात मान्यता मिळवून देऊ तिला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवू. 


मराठी असे आमुची मायबोली
अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ती गेली
उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळीं

या कडव्यात माधव ज्युलियन असं बोलायचं आहे की मराठी ही आपली थोर मायबोली आहे पण पारतंत्र्यात ही खूप खंगली गेली आहे दुर्लक्षित झाली आहे. आपल्या मायबोलीकच्या संपत्तीचा लोकांना आता विसर पडला आहे काळाच्या ओघात आपल्या माय मराठी ची संपत्ती ही एकदम तळाला जाऊन पोचलेली आहे.

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें
नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा
जगांतील भाषा हिला खंडणी

या कडव्यात माधव जूलियन यांना असे बोलायचे आहे की आपल्या माय मराठीच्या साहित्य साठा हा सागरासारखा अखंड आहे विराट आहे त्यांच्या आम्ही सगळे मिळून मंथन करू आणि त्यातून जी साहित्यातली उत्कृष्ट अशी रत्ने आहेत त्यांना एक एक करून बाहेर काढू त्यांना जगाच्या समोर घेऊन जाऊ आमची साहित्य समृद्धी एवढी अफाट आहे अखंड आहे की तिला दुसऱ्या कोणत्याही भाषेचं ऋण घेण्याची गरज नाही उलट जगातील बाकी भाषा या आपल्या माय मराठीचे देणे लागतात. 

          तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद 
           
              ( सतिष अहिरे ) 

Tuesday 11 January 2022

वी.स. खांडेकर

वी. स. खांडेकर यांचा  जन्म  ११ जानेवारी १८९८  रोजी सांगली येथे झाला. आणि मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६ रोजी मिरज येथे झाला.

त्यांचं जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर होत. ते प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांची ययाती ही सगळ्यात प्रसिद्ध कादंबरी आहे .

वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी) साठी मिळाला आणि  पद्मभूषण पुरस्कार (१९६८) तसेच  ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी मिळालं त्यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.

   त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे; त्यासाठी डाॅ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसाहाय्य केले आहे.

अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे. आणि त्यांची प्रकाशित झालेली  पुस्तके पुढील प्रमाणे आहेत .
१ अजून येतो वास फुलांना, २अमृत (पटकथा) ,३अमृतवेल
४ अविनाश, ५ अश्रू, ६ अश्रू आणि हास्य  ७ आगरकर  व्यकी आणि विचार, ८ उल्का (१९३४) (कादंबरी व पटकथा) ९ उःशाप, १०कल्पलता ११कांचनमृग (१९३१) १२ कालची स्वप्ने, १३ कालिका, १४ क्रौंचवध (१९४२), १५घरटे, १६ घरट्याबाहेर १७चंदेरी स्वप्ने, १८ चांदण्यात
छाया (पटकथा) १९ जळलेला मोहर , (१९४७ )  २० जीवनशिल्पी, २१ ज्वाला (पटकथा), २२ झिमझिम, २३तिसरा प्रहर, २४ तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३.         २५ ते दिवस, ती माणसे ,२६ दंवबिंदू ,२८देवता (पटकथा)
२८ दोन ध्रुव (१९३४), २९ दोन मने (१९३८), ३०धर्मपत्नी(पटकथा), ३१ धुके, ३२  नवा प्रातःकाल ३३ परदेशी (पटकथा) , ३४ पहिली लाट ,३५ पहिले पान
३६ पहिले प्रेम (१९४०) ३७ पाकळ्या ३८ पांढरे ढग (१९४९) ३९ पारिजात भाग १, २ ४० पाषाणपूजा ,       ४१ पूजन, ४२ फुले आणि काटे ४३ फुले आणि दगड    ४४ मंजिऱ्या, ४५ मंझधार ४६ मंदाकिनी ४७ मध्यरात्र ४८ मृगजळातील कळ्या ४९ ययाति ५० रंग आणि गंध ५१ रिकामा देव्हारा (१९३९) ५२ रेखा आणि रंग ५३लग्न पहावे करून (पटकथा व संवाद) ५४ वामन मल्हार जोशी : ५५ व्यक्ति-विचार ५६ वायुलहरी ५७ वासंतिका ५८ विद्युत्‌ प्रकाश ५९ वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८) ६० समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६१ समाधीवरील फुले ६२ सहा भाषणे ६३ सांजवात ६४ साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६५ सुखाचा शोध ६६ सुवर्णकण ६७ सूर्यकमळे ६८ सोनेरी ६९ सावली (पटकथा) ७० सोनेरी स्वप्ने भंगलेली.           ७१ स्त्री आणि पुरुष ७२ हिरवळ ७३ हिरवा चाफा (१९३८)
७४ हृदयाची हाक (१९३०) ७५ क्षितिजस्पर्श

पुढे वी. स खांडेकरांच्या कवितेतील काही ओळी व त्यांचं रस ग्रहण देत आहे

कोण दुजा आधार ?
तुजविण, कोण दुजा आधार ?

( हे पती परमेश्वरा तुझ्या विना आता मला हा कोणता आधार आहे अशी वी . स खांडेकर पती परमेश्वराला करून हाक मारत आहेत  )

अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार
काजळले नभ, काजळले मन, व्याकुळले मी फार

( आवती भवती अवसेचा खूप अंधार दाटला आहे . नभ आता त्या आधारे व्यापून गेलं आहे . आणि अशा उदास वातावरणात माझं मन देखील खूप उदास झालं आहे खिन्न झालं आहे  व्याकूळ झालं आहे )

कशि सावरू ? कुठे निवारा ? घालु कुणावर भार ?
पतितपावना एक तुझे मज उघडे आता दार
( आता मी स्वतःला कसं सावरु , आता कुठे मला प्रमाचा निवारा भेटेल. आता मी माझं दुःख कोणाला सांगू  त्याचा  भार  कसा हलक करू .

     एक एक ओळ अंगावर काटा आणतो. आपल्या काळजाच्या वेदनांना केवढ्या प्रभावी पने आणि  तरल ते ने   त्यांनी मांडलं आहे.   कुठे ही शब्दांची अती शोक्ती नाही.. ना कुठे ही अवजड अशा शब्दांचा वापर  नाही. त्या मूळचे त्याची कविता ही खूप जिवंत वाटते बोलली वाटते. काळजाला भिडते .
     अशा थोर लेखकाला  माझे कोटी कोटी प्रणाम.
    
       ( सतिष अहिरे )