Friday, 28 January 2022

चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे


चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; -
 नाशिक मध्ये गोदावरीच्या तीरी तील भंडारेश्वर महादेवा शेजारी त्यांच्या घराण्याचं वडिलोपार्जित घर होतं. तिथे २९ जानेवारी १८७१  रोजी त्यांचा जन्म झाला. 
त्यांचा वडिलांचे नाव शिवराम रामकृष्ण आईचे नाव म मणिकर्णिनिकाबाई होते.त्यांना आधी वामाराव आणि नारायणराव हे पुत्र झाले आणि नारायणरावांच्या नंतर वीस वर्षांनी कवी चंद्रशेखर यांचा जन्म झाला. ते शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण होते. 

त्यांचे मराठी शिक्षण दाजी पंतोजी यांच्या गावातील शाळेत झाले आणि नाशिक मधील  सरकारी नंबर ३ या शाळेत झाले. पाचवी इयत्ता मराठीत उत्तीर्ण झाल्यानंतर ते इंग्रजी शिकण्यासाठी  नाशिक हायस्कूलला जाऊ लागले. 

 त्यांच्या कवितालेखनची सुरुवात कशी झाली याचा ही एक  सुंदर किस्सा आहे . ते शाळेला सुट्टी लागल्यानंतर सिन्नरला आपल्या नातेवाईकांकडे गेले होते त्यावेळी सिन्नर हे बागायतदार क्षेत्र होतं तिकडंचा , निसर्ग खूप सुंदर होता, मनाला भावणारा असा होता आणि अशा वातावरणात त्यांचं कवी मन जागं झालं आणि ते गुणगुणायला लागेले आणि त्यांनी आपला  पहिला स्तोत्र हा त्यावेळी लिहून काढला  तो असा होता. 

 '  नारायणा शरण त्या करुणालया मी ' 

त्यांनी ते स्तोत्र त्यांचे काका म्हणजेच गोपूतात्यां यांना वाचून दाखवले. गोपूतात्यांना ते  खूप आवडले आणि त्यांनी कवी चंद्रशेखर यांच्या पाठीवरती शाब्बासकीचा हात फिरवला आणि तू नक्की कधी होशील अशी शाब्बासकी दिली.

पुढे त्यांचे इंग्रजी शिक्षण बडोदा हायस्कूल आणि त्यानंतर विश्राम बागेतील पुणे हायस्कूल येथे झाले. 

असेच निवांत बसले होते तेव्हा  वसंताची सुरुवात झाले होते कोकिळेचे स्वर  तेव्हा सर्वत्र घुमायला लागले होते  आणि तो कोकिळेचा स्वर   त्यांच्या मनाला मोहून टाकत होता,  आणि यामुळेच त्यांचं  कविमन पुन्हा जाग  झालं आणि त्यांनी आपली पहिली कविता " कोकील " ही रचली  आणि ती १८ मे १८९५ रोजी एका अंकात  प्रकाशितही झाली .

त्यांचे शिक्षण झाल्यावर तिथे पुढे नोकरीधंद्या निमित्त अमदाबाद ला गेले.पण तिकडे त्यांचे कामात मन लागत नव्हते ते कवितेच्या विश्वास हरवत चाललेले होते. त निमूटपणे अमदाबाड हून बडोद्याला आले व त्यांचे बंधू नारायणराव यांच्या कडे राहिले. त्यांना बर्‍याचशा भाषांचे ज्ञान होतं त्यामुळे तिथे त्यांना सरकारी ऑफिसात कारकुनाची नोकरी मिळाली. प्रथम त्यांनी दिवाण कचेरीत एक वर्ष हंगामी कारकुनाचे काम केले आणि नंतर लगेच त्यांना राज्यातील चीफ मेडिकल ऑफिसर यांनी आपल्या कचेरीत बोलून घेतले. 
याच वेळी त्यांचा कविवर्य दत्तात्रेय कोंडो यांच्याशी परिचय घडून आला . आणि त्यांच्या साहित्यिक बरकतीचा काळ सुरू झाला. 

चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशी कविता त्यांनी लिहिली. इंग्रजी कवितेचे वाचनमनन त्यांनी केलेले असले, तरी तिच्यातील स्वच्छंदतावादी संप्रदायाचे त्यांना आकर्षण नव्हते मात्र मिल्टनसारखा विदग्ध, व्यासंगी कवी त्यांना जवळचा वाटत होता. कवितेतून आत्मलेखन करणे त्यांना मान्य नव्हते. कवितेने ज्ञान आणि रस ह्यांचा एकात्म अनुभव द्यावा, अशी त्यांची काव्यविषयक भूमिका होती आणि ह्या भूमिकेतून त्यांनी काव्यकलेची आजीव आणि निष्ठापूर्वक उपासना केली. पंडीत कवींचे अलीकडच्या काळातील एक ज्येष्ठ प्रतिनिधी, असे त्यांना यथार्थपणे म्हटले जाते. ‘गोदागौरव’ आणि ‘कविता-रति’ ह्या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कविता. ‘गोदागौरवा’चे नादमाधुर्य जयदेवाच्या गीतगोविंदाची स्मृती करून देते. ह्या दोन्ही कवितांतील— विशेषतः ‘कविता-रति’ मधील –आत्मपरता चंद्रशेखरांच्या कवितेत अपवादभूत आणि म्हणून विशेष लक्षणीय आहे. कवी म्हणून त्यांची कीर्ती प्रामुख्याने चंद्रिका (१९३२) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहावर अधिष्ठित आहे. ह्या संग्रहास लाभलेल्या यशामुळेच बडोदे संस्थानाचे राजकविपद त्यांना मिळाले.

त्यांनी काही उत्कृष्ट रूपांतरेही केली. मिल्टनच्या इल् पेन्सरोझो  आणि ल’ आलेग्रो  ह्या काव्यांची अनुक्रमे ‘चिंतोपंत उदास’ आणि ‘रंगराव हर्षे’ ह्या नावांनी त्यांनी केलेली रूपांतरे, तसेच ‘काय हो चमत्कार’ हे एका इंग्रजी बॅलडचे रूपांतर ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरतात.

ह्यांशिवाय ‘उगडं गुपित्’ व किस्मतपूरचा जमीनदार (१९३६) ही स्वतंत्र कथाकाव्ये त्यांनी लिहिली असली, तरी ती फारशी मान्यता पावली नाहीत.
त्यांची साहित्यिक संपदा ही पुढील प्रमाणे आहेत 
अर्वाचीन कविता
उघडं गुपित (कथाकाव्य)
कविता रति
किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
गोदागौरव (स्तोत्रकाव्य)
चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२)
चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
चैतन्यदूत (दीर्घकाव्य)
धनगर (दीर्घकाव्य)
रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर
स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)
पुढे त्यांची एक रचना आणि त्याचे  रसग्रहण हे आपल्या समोर मी देत आहे . 

         समरमहिमा
         
         ही कविता कवीने रणभूमी ही विरपत्नी साठी उद्देशून बोलत आहे या अर्थाने लिहिली आहे . कवी चंद्रशेखर आपल्या पहिल्या ओळीत म्हणतात की 

आली तटस्थ झाली, थरके अधरोष्ठ, आंसवें गळती ।
रणदेवताही झाली त्या वीरस्त्रीसमोर विरघळती ।।१।।

 याचा ओळींचा अर्थ असा होतो की  ती  वीर पत्नी तटस्थपणे उभी राहिली आहे . तिचे ओठ थरथर कापतात आणि आता तिची  आसवे ही  गळायला लागलेली आहेत.  ही रण देवताही त्या वीर स्त्रीच्या दुःखामुळे आता स्वतःही दुःखी झाली आहे . 

'बाई' तिला म्हणे ती, पदराने टिपुनी नयनवारीतें ।
'सांगू काय तुला मी आले कामास कारभारी ते! ।।२।।

 या ओळींचा अर्थ असा आहे की आता रण देवताही त्या वीर पत्नीच्या संत्वणासाठी बाकी आलेली आहे आपल्या पदराने ते तिचे अश्रू टिपून घेत आहे. पण रण देवतेला आता काळात नहीये की त्या वीर पत्नीला कसं सांगावं की तिचे स्वामी  आपलं कर्तव्य निभवताना त्यांना वीर मरण आलेल आहे.

पंचाननापरी गे परचक्रावरी तुटोनी तो पडला ।
असहाय! काय करितो? लढला, लढला, थकोनियां पडला! ।।३।।
या ओळींचा आर्थ असा आहे की  वीर शत्रूवर सिन्हा सारखा  तुटून पडला पण रणांगणात शेवटी तो खूप थकला आणि शेवटी असहाय झाला  आणि   लढाता लढता त थकले  जमिनीवर पडला 

पडला गे पडला तो वीर रणी धूलिमाजी पडलाहे ।
कज्जलमिश्रित अश्रू हीच तया तूं तिलांजली वाहे ।।४।।

या ओळीचा आर्थ असा आहे की तो शुर वीर आता निपचित होवून जमिनीवर पडलेला आहे .. आणि तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या काजळ मिश्रित अश्रू हेच तिने  त्यांना वाहिलेली तिलांजली आहे 

विद्युत्प्राय सभोती चमकत असता सुतीव्र तरवारी ।
त्यांतुनी अचल उभा तो, पर्वतगर्व स्वनिश्चयें हारी ।। ५।।

या ओळींचा अर्थ असा आहे की  विजेच्या सारख्या   लखलखनाऱ्या तलवारी  ससभोवतली  चमकत असताना ही तो वीर  निर्धास्त  त्यांच्या समोर उभा राहिला होता त्याला तसं पाहून पर्वताचा गर्व ही त्याच्या पुढे फिका पडला होता. 

जे संग्रामधुरंधर रिपुसंहारार्थ करिती घोर रण ।
त्या वीरांते यावे, तैसे सन्मान्य यास ये मरण ।।६।।

या ओळींचा अर्थ आसा आहे की   रणांगणात  शत्रुच्या संहारासाठी तो वीरा प्रमाणे  लढला आहे . आणि लढता लढता त्याला वीर मरण आलं आहे . 

तद्वेश केशरी तो, झालाहे चिवट मेणकापडसा ।
चढुनी पुटे रुधिराची नुमजे होता तयास रंग कसा ।।७।।

 या ओळींचा अर्थ असा आहे की त्याचा वेश हा केसरी झालं आहे. त्याचे कपडे मेणा सारखे रक्ताने चिकट झाले आहेत. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे एवढे डाग पडले आहेत ही त्या कपड्यांचा मूळ रंग आता ओळखता येत नाही ये.

जेथे देह तयाचा गळला, तेथे तयास तुटवोनी ।
राऊत बहू पडले, शतावधी अरिशिरांस उडवोनी ।। ८।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की शेकडो शत्रूंचे मुंडके उडवल्या नंतर त्यांचा देह शेवटी रणांगणात निपचीत पडला.

अपुल्या प्रिय देशास्तव वीर जसा पाहिजे रणी लढला ।
लढला तसाच तोही, पाहुनी शतशें रिपू स्वयें पडला ।।९।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की तो वीर आपल्या प्रिय देशासाठी विरा प्रमाणे लढला जरी त्याच्या समोर शेकडो शत्रू होते. 


गृंध्रादिक आकाशी घिरट्या जे घालिती प्रभाती ते ।
त्वप्रियजनदेहावरी करितिल उदईक मेजवानीते ।।१०।।

 या ओळींचा अर्थ आसा आहे की आज आकाशात जे गिधाडे घिरक्या घालत आहेत ते उद्या  युद्धात शहीद झालेले जे वीर होते हे या विरास प्रिय होते पण आता ती गिधाडे त्या  वीरांच्या  देहाचे लागते लचके अन लचके तोडून मेजवानी करतील 

हे वीरवल्लभे तूं संतत करशील शोक बहू त्याचा
कवी गातील तयाचा महिमा तत्प्राणहारिं समराचा ।। ११।।

या ओळींचा अर्थ असा आहे की हे वीर पत्नी तू त्या विराचा रोज  शोक करशील पण  त्यांची महिमा कवी आपल्या कवितेतून सादर करतील त्यांनी दिलेले  बलिदान वाया जाणार नाही त्यांचं कर्तृत्व हे  अखंड जिवंत राहील 

   या कवितेत कवी चंद्रशेखर यांनी किती सुंदर पने  रणभूमीचे आणि त्या रणभूमी साठी लढलेल्या त्या विरचे चित्र रेखाटले आहे.. आपल्या पतीच्या दुःखात चिंब बुडलेल्या वीर पत्नीचे दुःख ही किती सुंदर रित्या मांडलं आहे... किती जिवंत पणा आहे त्याच्या लिखाणात.... आज त्यांची जयंती आहे त्यांना लाख लाख वंदना देतो आणि तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद. ..
  ( सतिष अहिरे ) 

Friday, 21 January 2022

माधव ज्युलियन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी आजोळी बडोदा, येथे झाला होता आणि मृत्यू -२९ नोव्हेंबर १९३९ पुण्यामध्ये त्याच्या राहत्या घरी झाला होता. त्यांचं पाळण्यातले नाव 'गजानन' असं होत पण लहान पणी दोन महिन्यांचे असताना ते अखंड रडू लागले म्हणून त्यांच्या आत्या बाईनी त्यांची जोड्याने तुळा केली व घराण्याचा मूळ पुरुष ' महादेव ' हे जुनाट नाव त्यांना ठेवलं. मोठेपणी कॉलेजात गेल्यावर त्यांना ते नाव अवडेनासे झाले आणि १९१२ पासून त्यांनी स्वतःचे नाव बदलून 'माधव ' असे ठेवले आणि तेच नाव पुढे रूढ झाले .
   
    त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला होता.

माधव जूलियन हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधव जूलियन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले .
पण माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

गजल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव जूलियन यांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. तसेच त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

माधव जूलियन यांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

 माधव जूलियन कार्यमग्न असताना आणि यशाच्या शिखरावर असताना अचानक पणे गेले त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता पुण्याच्या स्वतःच्या राहत्या घरी २९ नोव्हेंबर १९३९ च्या रात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यावेळी ते केवळ ४६ वर्षाचे होते.

माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.
स्वप्नभूमी माधव ज्यूलियन : लेखक शंकर केशव कानेटकर
डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन : लेखक दत्तात्रेय नरसिंह गोखले
माधव ज्यूलियन : गंगाधर देवराम खानोलकर

माधव ज्यलियन यांची ग्रंथ संपदा पुढील प्रमाणे आहे.
उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)
काव्यविहार (निधनोत्तर इ.स. १९४७, लेखसंग्रह)
गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
नकुलालङ्कार (इ.स. १९२९, दीर्घकाव्य)
फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)

ते इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते तसेच इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
 इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन.अध्यक्ष होते 
पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
       माधव ज्युलियन यांना केवळ ४६ वर्षाचं आयुष लाभलं त्यातील सुरुवातीचे २४ वर्ष शैक्षणिक काळ यातून वजा करता फक्त २२ वर्ष त्यांच्या साहित्य कर्तुत्वाचे म्हणता येतील. या अल्प काळात त्यांनी केलेली साहित्य निर्मिती ही विपुल व वैविध्यपूर्ण आहे.
    माधव ज्युलियन यांचं काव्य कर्तुत्व फार मोठा आहे. त्यांचे इतर बरेचसे गद्यलेखनही काव्य लेखनाशी संबंधित आहे.
     त्यांचे सर्व जीवन हे त्यांच्या काव्यात व्यक्त झालेले आहेत. त्यांच्या कवितेला कोणाची ही परंपरा नाही , ती स्वतंत्र आहे. तिच्यावर इंग्रजी ,फारसी ,संस्कृत ,गुजराती या भाषेचेही संस्कार आहेत पण त्या भाषेतील काव्याचे अनुकरण नाही. प्रत्येक काव्यात आशय आणि अभिव्यक्ती या पूर्णपणे वेगळ्या आहेत.
     माधव ज्युलियन यांच्या साहित्यात विविधता आहे त्यांनी स्फुट काव्य लिहिली, दीर्घकाव्य लिहिली ,अनेक लेख लिहिले, फारसी मराठी शब्दकोश तयार केला, छंदोरचना हा काव्याची माहिती आणि त्या संबधित वृत्ते आणि त्यांची उदाहरणे याप्रकारे आपल्या माहितीपूर्ण ग्रंथ लिहून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.
   आम्ही आज देखील त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आहोत. गजल शिकत आहोत लिहत आहोत. मराठी साहित्यात गजल हा प्रकार त्यांनी आणला म्हणून आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत... त्यांच्या कर्तुत्वाला लाख लाख सलाम..  
   आज त्यांची एक कविता आणि तिचं रसग्रहण आपल्या समोर देत आहे .

मराठी असे आमुची मायबोली,
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे

मराठी असे आमची मायबोली या कवितेत माधव ज्युलियन याची मराठी विषयीची तळमळ आपल्याला दिसून येते. कवितेतील पहिल्या कडव्यात ते बोलून जातात की मराठी जरी राज भाषा नाही तरी ती आमची माय बोली आहे. आज तिला ते ऐश्वर्य प्राप्त झालेला नाही ते महत्त्व प्राप्त झालेले नाही , तरी मला पूर्णपणे अशी आशा आहे की एक दिवस तिला तिचं महत्त्व तिचं ऐश्वर्य प्राप्त होईल. 
   

जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

या कडव्यात माधव ज्युलियन सांगताय की आज जरी सात खंड आहेत पूर्वी केवळ पाच खंड होती . आणि त्या काळातही इंग्रजीचं वर्चस्व पाचही खंडांमध्ये होतं इंग्रजी भाषाही त्यावेळी श्रीमंतीच्या शिखरावर होती. इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेला तेवढं महत्त्व राहिलं नव्हतं म्हणून कवी ही कळकळीची विनंती करताहेत की आपल्या मायबोलीला असे त्यागु नका. 

जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेलें नवें राष्ट्र हे हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती
हिची जाणुनी योग्यता थोरवी
मराठी असे आमुची मायबोली,
जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी,
हिच्या एक ताटात आम्ही बसूं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असे बोलायचे आहे की जरी आज हिंदी भाषेला देशभर मान्यता प्राप्त झाली असेल. हे जरी नवे हिंदवी राज्य तयार झाले असेल तरीपण जे मनापासून मराठी आहे त्यांच्या मनात आपली मायबोली मराठीही वसते ते जरी भिन्न भिन्न जातीची धर्माचे असो वा पंतांचे असो तरीही आपल्या मायबोली बद्दल त्यांच्या मनात आस्था आहे. आणि आपल्या माय मराठी साठी आम्ही बंधुभाव हृदयात बसवला आहे आणि आपल्या मायबोलीसाठी आ आपापसातले मतभेद विसरून सर्व एकत्र आलेलो आहोत. 

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं,
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी,
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे,
हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं!

या कडव्यात माधव ज्युलियन यांना असं बोलायचं आहे की आम्ही या माय मराठीचे पुत्र आहोत तिचे पांग आम्ही नक्कीच फेडू आमच्या हृदय मंदिरात फक्त माय मराठीच वसते आम्ही सगळे मिळून तिला या जगात मान्यता मिळवून देऊ तिला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवू. 


मराठी असे आमुची मायबोली
अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ती गेली
उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळीं

या कडव्यात माधव ज्युलियन असं बोलायचं आहे की मराठी ही आपली थोर मायबोली आहे पण पारतंत्र्यात ही खूप खंगली गेली आहे दुर्लक्षित झाली आहे. आपल्या मायबोलीकच्या संपत्तीचा लोकांना आता विसर पडला आहे काळाच्या ओघात आपल्या माय मराठी ची संपत्ती ही एकदम तळाला जाऊन पोचलेली आहे.

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें
नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा
जगांतील भाषा हिला खंडणी

या कडव्यात माधव जूलियन यांना असे बोलायचे आहे की आपल्या माय मराठीच्या साहित्य साठा हा सागरासारखा अखंड आहे विराट आहे त्यांच्या आम्ही सगळे मिळून मंथन करू आणि त्यातून जी साहित्यातली उत्कृष्ट अशी रत्ने आहेत त्यांना एक एक करून बाहेर काढू त्यांना जगाच्या समोर घेऊन जाऊ आमची साहित्य समृद्धी एवढी अफाट आहे अखंड आहे की तिला दुसऱ्या कोणत्याही भाषेचं ऋण घेण्याची गरज नाही उलट जगातील बाकी भाषा या आपल्या माय मराठीचे देणे लागतात. 

          तूर्तास इथेच थांबतो धन्यवाद 
           
              ( सतिष अहिरे ) 

Tuesday, 11 January 2022

वी.स. खांडेकर

वी. स. खांडेकर यांचा  जन्म  ११ जानेवारी १८९८  रोजी सांगली येथे झाला. आणि मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६ रोजी मिरज येथे झाला.

त्यांचं जन्म नाव गणेश आत्माराम खांडेकर होत. ते प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांची ययाती ही सगळ्यात प्रसिद्ध कादंबरी आहे .

वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी) साठी मिळाला आणि  पद्मभूषण पुरस्कार (१९६८) तसेच  ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी मिळालं त्यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.

   त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.

इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे; त्यासाठी डाॅ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसाहाय्य केले आहे.

अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे. आणि त्यांची प्रकाशित झालेली  पुस्तके पुढील प्रमाणे आहेत .
१ अजून येतो वास फुलांना, २अमृत (पटकथा) ,३अमृतवेल
४ अविनाश, ५ अश्रू, ६ अश्रू आणि हास्य  ७ आगरकर  व्यकी आणि विचार, ८ उल्का (१९३४) (कादंबरी व पटकथा) ९ उःशाप, १०कल्पलता ११कांचनमृग (१९३१) १२ कालची स्वप्ने, १३ कालिका, १४ क्रौंचवध (१९४२), १५घरटे, १६ घरट्याबाहेर १७चंदेरी स्वप्ने, १८ चांदण्यात
छाया (पटकथा) १९ जळलेला मोहर , (१९४७ )  २० जीवनशिल्पी, २१ ज्वाला (पटकथा), २२ झिमझिम, २३तिसरा प्रहर, २४ तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३.         २५ ते दिवस, ती माणसे ,२६ दंवबिंदू ,२८देवता (पटकथा)
२८ दोन ध्रुव (१९३४), २९ दोन मने (१९३८), ३०धर्मपत्नी(पटकथा), ३१ धुके, ३२  नवा प्रातःकाल ३३ परदेशी (पटकथा) , ३४ पहिली लाट ,३५ पहिले पान
३६ पहिले प्रेम (१९४०) ३७ पाकळ्या ३८ पांढरे ढग (१९४९) ३९ पारिजात भाग १, २ ४० पाषाणपूजा ,       ४१ पूजन, ४२ फुले आणि काटे ४३ फुले आणि दगड    ४४ मंजिऱ्या, ४५ मंझधार ४६ मंदाकिनी ४७ मध्यरात्र ४८ मृगजळातील कळ्या ४९ ययाति ५० रंग आणि गंध ५१ रिकामा देव्हारा (१९३९) ५२ रेखा आणि रंग ५३लग्न पहावे करून (पटकथा व संवाद) ५४ वामन मल्हार जोशी : ५५ व्यक्ति-विचार ५६ वायुलहरी ५७ वासंतिका ५८ विद्युत्‌ प्रकाश ५९ वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८) ६० समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६१ समाधीवरील फुले ६२ सहा भाषणे ६३ सांजवात ६४ साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
६५ सुखाचा शोध ६६ सुवर्णकण ६७ सूर्यकमळे ६८ सोनेरी ६९ सावली (पटकथा) ७० सोनेरी स्वप्ने भंगलेली.           ७१ स्त्री आणि पुरुष ७२ हिरवळ ७३ हिरवा चाफा (१९३८)
७४ हृदयाची हाक (१९३०) ७५ क्षितिजस्पर्श

पुढे वी. स खांडेकरांच्या कवितेतील काही ओळी व त्यांचं रस ग्रहण देत आहे

कोण दुजा आधार ?
तुजविण, कोण दुजा आधार ?

( हे पती परमेश्वरा तुझ्या विना आता मला हा कोणता आधार आहे अशी वी . स खांडेकर पती परमेश्वराला करून हाक मारत आहेत  )

अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार
काजळले नभ, काजळले मन, व्याकुळले मी फार

( आवती भवती अवसेचा खूप अंधार दाटला आहे . नभ आता त्या आधारे व्यापून गेलं आहे . आणि अशा उदास वातावरणात माझं मन देखील खूप उदास झालं आहे खिन्न झालं आहे  व्याकूळ झालं आहे )

कशि सावरू ? कुठे निवारा ? घालु कुणावर भार ?
पतितपावना एक तुझे मज उघडे आता दार
( आता मी स्वतःला कसं सावरु , आता कुठे मला प्रमाचा निवारा भेटेल. आता मी माझं दुःख कोणाला सांगू  त्याचा  भार  कसा हलक करू .

     एक एक ओळ अंगावर काटा आणतो. आपल्या काळजाच्या वेदनांना केवढ्या प्रभावी पने आणि  तरल ते ने   त्यांनी मांडलं आहे.   कुठे ही शब्दांची अती शोक्ती नाही.. ना कुठे ही अवजड अशा शब्दांचा वापर  नाही. त्या मूळचे त्याची कविता ही खूप जिवंत वाटते बोलली वाटते. काळजाला भिडते .
     अशा थोर लेखकाला  माझे कोटी कोटी प्रणाम.
    
       ( सतिष अहिरे ) 

Thursday, 6 January 2022

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म१९४३
सुल्लाळी, उस्मानाबाद मध्ये झाला होता व मृत्यू
जानेवारी ६, २०१० झाला होता . 
(आता हे गाव लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात आहे)

लहानपणी डोईवरचे माता-पित्याचे छत्र हरवले असले तरी, बहिणीने त्यांचा सांभाळ केला. गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा चालू होती. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी एलए‌ल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.
प्रा. सोनकांबळे सुरुवातीला गल्ले बोरगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. इ.स. १९६६ मध्ये ते डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे त्याच विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि इ.स. १९८८ मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. तेथूनच ते निवृत्त झाले.
     
    साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे गेले की ते तेथील व्यक्तींना आपल्या खिशातली फुले व खडीसाखर देत. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

त्यांनी नाटक, साहित्य
चळवळ दलित साहित्य, मराठी साहित्य यात आपले मोलाचे योगदान दिले त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती
 आठवणींचे पक्षी हे आहे .
 
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांना आपल्या जीवन काळात 
साहित्य अकादमी पुरस्कार(१९८३)
आदर्श शिक्षक पुरस्कार(१९९७)
'बेस्ट सिटिझन' हे पुरस्कार प्राप्त झाले. 
 औरंगाबादमधील तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तसेच 
मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले होते.

  प्रा. सोनकांबळे यांना साहित्य अकादमीचा १९८३मध्ये पुरस्कार मिळाला.
राज्य शासनानेदेखील पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
लातूर नगरपरिषदेने प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचा भूमिपुत्र म्हणून विशेष सत्कार केला होता.
अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रा. सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला होता.
रयत शिक्षणसंस्थेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९७)

आठवणींचे पक्षी : प्र. ई. सोनकांबळे यांचा आत्मकथनात्मक आठवणींचा लेखसंग्रह. दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ते ओळखले जाते. जीवनातील खडतर जातवास्तवाचे अनुभव प्र. ई. सोनकांबळे यांनी या लेखसंग्रहातून मांडले आहेत. या आत्मकथनात दलित जीवनाच्या मूलगामी दुःखाचे चित्रण येते. प्र. ई. सोनकांबळे यांच्या बालपणाची आणि शिक्षण काळातील हाल-अपेष्टांचे दर्शन प्रामुख्याने या आत्मकथनामध्ये घडते.१९६४ साली मिलिंद महाविद्यालयाच्या वार्षिकांकात प्रथमतः या आत्मलेखनातील लेख प्रसिद्ध झाला.म.ना.वानखेडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे लेखन घडले असल्याचे सोनकांबळे सांगतात.आरंभी यात १५ लेख होते. नंतरच्या आवृत्तीत ही संख्या २८ झालेली आहे.
आई मेल्यानंतर पोरका झालेला ‘परलाद’ ते प्राध्यापक व्यवसायात पडलेले प्र. ई.सोनकांबळे असा विस्तृत जीवनपट या आत्मकथनामध्ये मध्ये आहे.बालपणापासून कष्ट ते बहिणीकडे आश्रित म्हणून राहत असताना पडेल ती कामे करण्याचा जीवनाभुव त्यात आहे.अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चिंचोके, मृत जनावरांचे मांस त्यांना खावे लागले आहे. चतकोर भाकरीसाठी मेलेले कुत्रेही ओढून टाकावे लागले आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी प्र. ई. सोनकांबळे यांना अनेक लहान-मोठी कामे करावी लागली आहेत. महारोगी म्हातारीच्या ताटलीत जेवण्याचा आणि संडासमागे जाऊन भाकरीचा तुकडा खाण्याचा मन विषण्ण करणारा प्रसंगही यात आहे.अस्पृश्य समाजात जन्माला आल्याने सोनकांबळे यांना वारंवार अपमान, अवहेलना सहन करावी लागली आहे.जातीयता आणि आर्थिक विषमतेवरचे खोलवरचे चित्रण या आत्मकथनात आहे.जातीयतेच्या -उपेक्षेच्या आणि अवहेलनेच्या असंख्य अडचणीतून जीवनसंघर्षाचे रूप या आत्मकथनातून प्रकटले आहे.
मराठवाड्यातील उदगीर भागातील बोलीचा वापर, हा या आत्मकथनाचा महत्त्वाचा विशेष आहे. बोली भाषेमुळे यातील आठवणींना जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. सोनकांबळे यांच्या अनुभवविश्वाला साजेशी ही भाषा असून कोणताही संकोच न बाळगता मोठ्या धिटाईने व मोकळेपणाने त्यांनी आठवणींचे कथन केले आहे. प्रचंड अन्याय सोसूनही सोनकांबळे कोणाविषयी मनात अढी बाळगत नाहीत. उलट मदत करणाऱ्या सहानभूती दाखविणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख ते अतिशय नम्रपणे करतात.आत्मकथनाचे अकरा भारतीय भाषांत भाषांतरही झाले आहे.
              ( सतीष अहिरे ) 





डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

 डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्हात बागणी गावात झाला होता आणि मृत्यू एप्रिल २०, २००८ पुण्यात झाला होता. त्या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्‍या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.
 
   त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास, लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन इत्यादी कामे त्यांनी पार पाडली होती .

सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला चिं.ग. कर्वे हे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच सन 1958 मध्ये नियोजन आयोगाच्या शिक्षण विभागाच्या शिफारसीनुसार दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्त्री शिक्षणासंबंधीच्या आयोगाच्या त्या सचिव होत्या.

सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम होती. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. त्या अत्यंत उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.


डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या पुढील प्रमाणे आहे
अजिता (१९५३),आठवतंय तेवढं सांगते (१९५५),इथं गोष्ट संपली, कमळाचं जाळं (१९४६)
तू भेटायला नको होतास, स्वयंवर (१९७९), हिरवा चुडा

कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह पुढील प्रमाणे 
आमची गाणी, काळी मखमल, कुलाचार, खिरापत, खुणेची पाने, गुलाबकळी, ग्रामलक्ष्मी, चंद्राची भारजा, चिंचेची ,पत्रावळी, झालं गेलं सांगते, डोंगरची मैना, देवदर्शन, धरित्रीच्या लेकी, नवलाख तारांगण, नवलाखी हार, नव्याची पुनव, निरशा दुधाची घागर, निळे डोळे, पाटपाणी, भांगातुरा,भिंगरी, भूक लाडू तहान लाडू, मंगलाक्षता, महिला मंडळ, मानवी प्रवास, माहेरचा चंद्रमा, माझ्या घरची, मुक्तांगणं, यशोधरा, राधाई, राही रुक्मिणी, रुखवत, सुशोभन, स्थित्यंतर, स्वारी सुखात आहे.

  डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर याचे पप्रकशित झालेले काव्यसंग्रह . चाफेकळी, झोळणा (१९६४) हे आहेत.
  
  महिलांविषयक हे त्यांचे पुढील साहित्य आहे 
  मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत (१९६१)
  स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  स्त्रीशिक्षणाची वाटचाल 
  बालवाङ्मय मधे काचेची पेन्सील, जम्माडी जम्मत : भाग १ आणि २, बालनाटिका : भाग १ ते ४, भारतीय स्त्रीरत्‍ने भाग १ ते ४ इत्याती आहेत .
  
 माझ्या खुणा माझ्या मला हे त्यांचं आत्मचरित्र आहे 

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी संपादित केलेले पुस्तके 
आदिवासींचे सण-उत्सव, एक होता राजा, कारागिरी, कुलदैवत, छंद माझा आगळा, जनलोकांचा सामवेद, जाई मोगरा, जा माझ्या माहेरा, तीर्थांचे सागर, दसरा दिवाळी, नंदादीप, नादब्रम्ह, बाळराजे, भोंडला भुलाबाई
महाराष्ट्र लोकसाहित्य माला : ए्कूण ५ भाग
मी पाहिलेले यशवंतराव (१९८८), रांगोळी, राजविलासी, केवडा, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती - संमेलन वृतांत, लोकसाहित्य - भाषा आणि संस्कृती, लोकसाहित्य :, शब्दकोश, लोकसाहित्य साजशिणगार, वसंतदादा गौरव, ग्रंथ, वैजयंती, श्रावण भाद्रपद, समाज शिक्षण माला(नियतकालिक) (१९५० पासून), सांगीवांगी, स्त्रियांचे खेळ आणि गाणी इत्यादी आहेत 

आणि त्यांनी सहसंपादित केलेली पुस्तके ही पुढील प्रमाणे आहेत .
इयत्ता ७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : डॉ.वि.म.कुलकर्णी).
सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी

भूषविलेली पदे संपादन करा
१९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
१९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
१९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य

सन्मान व पुरस्कार संपादन करा
२५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.
५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
७ सप्टेंबर १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
२६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
१० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
२३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गौरव
मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार
जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यात डॉ.सरोजिनी बाबर यांचा सत्कार करण्यात आला.
१ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
१२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
२७ डिसेंबर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.

अशा थोर विचारवंत आणि साहित्यिक केला माझा कोटी कोटी प्रणाम जाता जाता त्यांची एक कविता खास आपल्यासाठी 

अडगूळ मडगूळ सोन्याचं कडबुळं
खेळायला आलं गं , लाडाच डबुलं

गालात हसून ,ओठात बोलून
हातानं खेळत काय ग म्हणाल

जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं 
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं

रांगत रांगत , हअम डौलत
 गुढग्यावर रेलून काय ग पाहिलं 

फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून 
कारंजं उडवीत कसं ग रागावलं

झेप झेपावून तोल सारून
नाचून नाचून पाय खुळखुळलं 

काजळ तितीट बाळाच्या मुठीत
माझ्या जीवचं सुख दाटलं 


  ( सतिष अहिरे )