Thursday, 6 January 2022

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म१९४३
सुल्लाळी, उस्मानाबाद मध्ये झाला होता व मृत्यू
जानेवारी ६, २०१० झाला होता . 
(आता हे गाव लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात आहे)

लहानपणी डोईवरचे माता-पित्याचे छत्र हरवले असले तरी, बहिणीने त्यांचा सांभाळ केला. गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा चालू होती. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी एलए‌ल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.
प्रा. सोनकांबळे सुरुवातीला गल्ले बोरगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. इ.स. १९६६ मध्ये ते डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे त्याच विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि इ.स. १९८८ मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. तेथूनच ते निवृत्त झाले.
     
    साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे गेले की ते तेथील व्यक्तींना आपल्या खिशातली फुले व खडीसाखर देत. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

त्यांनी नाटक, साहित्य
चळवळ दलित साहित्य, मराठी साहित्य यात आपले मोलाचे योगदान दिले त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती
 आठवणींचे पक्षी हे आहे .
 
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांना आपल्या जीवन काळात 
साहित्य अकादमी पुरस्कार(१९८३)
आदर्श शिक्षक पुरस्कार(१९९७)
'बेस्ट सिटिझन' हे पुरस्कार प्राप्त झाले. 
 औरंगाबादमधील तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तसेच 
मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले होते.

  प्रा. सोनकांबळे यांना साहित्य अकादमीचा १९८३मध्ये पुरस्कार मिळाला.
राज्य शासनानेदेखील पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
लातूर नगरपरिषदेने प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचा भूमिपुत्र म्हणून विशेष सत्कार केला होता.
अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रा. सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला होता.
रयत शिक्षणसंस्थेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९७)

आठवणींचे पक्षी : प्र. ई. सोनकांबळे यांचा आत्मकथनात्मक आठवणींचा लेखसंग्रह. दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ते ओळखले जाते. जीवनातील खडतर जातवास्तवाचे अनुभव प्र. ई. सोनकांबळे यांनी या लेखसंग्रहातून मांडले आहेत. या आत्मकथनात दलित जीवनाच्या मूलगामी दुःखाचे चित्रण येते. प्र. ई. सोनकांबळे यांच्या बालपणाची आणि शिक्षण काळातील हाल-अपेष्टांचे दर्शन प्रामुख्याने या आत्मकथनामध्ये घडते.१९६४ साली मिलिंद महाविद्यालयाच्या वार्षिकांकात प्रथमतः या आत्मलेखनातील लेख प्रसिद्ध झाला.म.ना.वानखेडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे लेखन घडले असल्याचे सोनकांबळे सांगतात.आरंभी यात १५ लेख होते. नंतरच्या आवृत्तीत ही संख्या २८ झालेली आहे.
आई मेल्यानंतर पोरका झालेला ‘परलाद’ ते प्राध्यापक व्यवसायात पडलेले प्र. ई.सोनकांबळे असा विस्तृत जीवनपट या आत्मकथनामध्ये मध्ये आहे.बालपणापासून कष्ट ते बहिणीकडे आश्रित म्हणून राहत असताना पडेल ती कामे करण्याचा जीवनाभुव त्यात आहे.अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चिंचोके, मृत जनावरांचे मांस त्यांना खावे लागले आहे. चतकोर भाकरीसाठी मेलेले कुत्रेही ओढून टाकावे लागले आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी प्र. ई. सोनकांबळे यांना अनेक लहान-मोठी कामे करावी लागली आहेत. महारोगी म्हातारीच्या ताटलीत जेवण्याचा आणि संडासमागे जाऊन भाकरीचा तुकडा खाण्याचा मन विषण्ण करणारा प्रसंगही यात आहे.अस्पृश्य समाजात जन्माला आल्याने सोनकांबळे यांना वारंवार अपमान, अवहेलना सहन करावी लागली आहे.जातीयता आणि आर्थिक विषमतेवरचे खोलवरचे चित्रण या आत्मकथनात आहे.जातीयतेच्या -उपेक्षेच्या आणि अवहेलनेच्या असंख्य अडचणीतून जीवनसंघर्षाचे रूप या आत्मकथनातून प्रकटले आहे.
मराठवाड्यातील उदगीर भागातील बोलीचा वापर, हा या आत्मकथनाचा महत्त्वाचा विशेष आहे. बोली भाषेमुळे यातील आठवणींना जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. सोनकांबळे यांच्या अनुभवविश्वाला साजेशी ही भाषा असून कोणताही संकोच न बाळगता मोठ्या धिटाईने व मोकळेपणाने त्यांनी आठवणींचे कथन केले आहे. प्रचंड अन्याय सोसूनही सोनकांबळे कोणाविषयी मनात अढी बाळगत नाहीत. उलट मदत करणाऱ्या सहानभूती दाखविणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख ते अतिशय नम्रपणे करतात.आत्मकथनाचे अकरा भारतीय भाषांत भाषांतरही झाले आहे.
              ( सतीष अहिरे ) 





डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

 डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्हात बागणी गावात झाला होता आणि मृत्यू एप्रिल २०, २००८ पुण्यात झाला होता. त्या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्‍या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.
 
   त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास, लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन इत्यादी कामे त्यांनी पार पाडली होती .

सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला चिं.ग. कर्वे हे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच सन 1958 मध्ये नियोजन आयोगाच्या शिक्षण विभागाच्या शिफारसीनुसार दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्त्री शिक्षणासंबंधीच्या आयोगाच्या त्या सचिव होत्या.

सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम होती. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. त्या अत्यंत उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.


डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या पुढील प्रमाणे आहे
अजिता (१९५३),आठवतंय तेवढं सांगते (१९५५),इथं गोष्ट संपली, कमळाचं जाळं (१९४६)
तू भेटायला नको होतास, स्वयंवर (१९७९), हिरवा चुडा

कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह पुढील प्रमाणे 
आमची गाणी, काळी मखमल, कुलाचार, खिरापत, खुणेची पाने, गुलाबकळी, ग्रामलक्ष्मी, चंद्राची भारजा, चिंचेची ,पत्रावळी, झालं गेलं सांगते, डोंगरची मैना, देवदर्शन, धरित्रीच्या लेकी, नवलाख तारांगण, नवलाखी हार, नव्याची पुनव, निरशा दुधाची घागर, निळे डोळे, पाटपाणी, भांगातुरा,भिंगरी, भूक लाडू तहान लाडू, मंगलाक्षता, महिला मंडळ, मानवी प्रवास, माहेरचा चंद्रमा, माझ्या घरची, मुक्तांगणं, यशोधरा, राधाई, राही रुक्मिणी, रुखवत, सुशोभन, स्थित्यंतर, स्वारी सुखात आहे.

  डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर याचे पप्रकशित झालेले काव्यसंग्रह . चाफेकळी, झोळणा (१९६४) हे आहेत.
  
  महिलांविषयक हे त्यांचे पुढील साहित्य आहे 
  मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत (१९६१)
  स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  स्त्रीशिक्षणाची वाटचाल 
  बालवाङ्मय मधे काचेची पेन्सील, जम्माडी जम्मत : भाग १ आणि २, बालनाटिका : भाग १ ते ४, भारतीय स्त्रीरत्‍ने भाग १ ते ४ इत्याती आहेत .
  
 माझ्या खुणा माझ्या मला हे त्यांचं आत्मचरित्र आहे 

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी संपादित केलेले पुस्तके 
आदिवासींचे सण-उत्सव, एक होता राजा, कारागिरी, कुलदैवत, छंद माझा आगळा, जनलोकांचा सामवेद, जाई मोगरा, जा माझ्या माहेरा, तीर्थांचे सागर, दसरा दिवाळी, नंदादीप, नादब्रम्ह, बाळराजे, भोंडला भुलाबाई
महाराष्ट्र लोकसाहित्य माला : ए्कूण ५ भाग
मी पाहिलेले यशवंतराव (१९८८), रांगोळी, राजविलासी, केवडा, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती - संमेलन वृतांत, लोकसाहित्य - भाषा आणि संस्कृती, लोकसाहित्य :, शब्दकोश, लोकसाहित्य साजशिणगार, वसंतदादा गौरव, ग्रंथ, वैजयंती, श्रावण भाद्रपद, समाज शिक्षण माला(नियतकालिक) (१९५० पासून), सांगीवांगी, स्त्रियांचे खेळ आणि गाणी इत्यादी आहेत 

आणि त्यांनी सहसंपादित केलेली पुस्तके ही पुढील प्रमाणे आहेत .
इयत्ता ७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : डॉ.वि.म.कुलकर्णी).
सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी

भूषविलेली पदे संपादन करा
१९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
१९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
१९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य

सन्मान व पुरस्कार संपादन करा
२५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.
५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
७ सप्टेंबर १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
२६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
१० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
२३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गौरव
मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार
जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यात डॉ.सरोजिनी बाबर यांचा सत्कार करण्यात आला.
१ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
१२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
२७ डिसेंबर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.

अशा थोर विचारवंत आणि साहित्यिक केला माझा कोटी कोटी प्रणाम जाता जाता त्यांची एक कविता खास आपल्यासाठी 

अडगूळ मडगूळ सोन्याचं कडबुळं
खेळायला आलं गं , लाडाच डबुलं

गालात हसून ,ओठात बोलून
हातानं खेळत काय ग म्हणाल

जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं 
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं

रांगत रांगत , हअम डौलत
 गुढग्यावर रेलून काय ग पाहिलं 

फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून 
कारंजं उडवीत कसं ग रागावलं

झेप झेपावून तोल सारून
नाचून नाचून पाय खुळखुळलं 

काजळ तितीट बाळाच्या मुठीत
माझ्या जीवचं सुख दाटलं 


  ( सतिष अहिरे )