आमच्या कळंबोली मध्ये एक तळ आहे. मला कधी मोकळा वेळ भेटला की मी तिकडे जाऊन बसतो. खूप शांत आणि मनाला प्रसन्न करणार वातावरण असते तिकडे. वाऱ्याचा झुळ झुळ करणारा आवाज ,पक्षांची किलबिल आणि माशांचा पाण्यात हलकेच सूर मारल्याचा आवाज मनाला एका वेगळ्या प्रकारच्या शांतीचा अनुभव करून देत असते. दिवसभराच सार टेन्शन ,सारा थकवा एक क्षणात निघून जातो .
तळ्याच्या समोर एक छानसा कट्टा आहे, मी नेहेमी त्या काट्यावर जाऊन बसतो . माझी कित्येक सुख- दुःख त्या कट्ट्याने खूप जवळून पहिली आहेत. माझ्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाचा तो वाटेकरी आहे ,सोबती आहे. खुप काही आठवणी आहे.माझ्या त्या कट्ट्या सोबत कधी भावनांच्या सागरने आपलं उर भरून आलं की आपल्याला मोकळं होण्यासाठी एक तर हक्काचा असा माणूस तरी लागतो नाहीतर हक्काची अशी जागा तरी लागते जिथे आपल्याला मनसोक्त हसता येत ,मनसोक्त रडता येत, मोकळं होता येत.आज पुन्हा मी त्या कट्टयावर जाऊन बसलो. पुन्हा तो वाऱ्याचा झुळ झुळ करणारा आवाज येत होता , पक्षांची किलबिल ऐकू येत होती, मला खूप छान वाटत होतं. मी तळ्याकडे कडे एकटक बघत बसलो होतो.तळ्यात माशांचे ते हलकेच सूर मारणं आणि त्याचा तो आवाज आणि त्याच्या मुळे पाण्यावर उठणारे ते तरंग मी गुंतत जात होतो. त्या वातावरणात मनाला एक प्रकारची समाधी लागल्याचा अनुभव होत होता.
तेवढ्यात तिकडे एक गृहस्थ आले आणि मनाला सुखावणाऱ्या त्या शांततेचा भंग झाला.त्यांचे ते विस्कटलेले केस, अस्थवेस्थ असे कपडे, डोळ्यात घातलेला जाड्या भिंगाचा अर्धवट तुटलेला तो चष्मा खांद्यावर लटकवलेली ती कापडाची मळलेली पिशवी एकदम अजबच त्यांचा अवतार वाटत होता. काही वेळ ते शांत बसले आणि आपल्या पिशवीत काही तरी शोधायला लागले.. आणि खूप बैचेन झाले. बऱ्याच वेळ ते काही तरी शोधत होते.
मला त्यांची ती अवस्था बघवत नव्हती पण बोलायचं कसं हा प्रश्न पडला होता. शेवटी मला राहवलं नाही आणि मी बोललो
'काका काय झालं ?'
' काय शोधताय तुम्ही? काही हरवलं आहे का ?
आपल्या तुटलेल्या चष्म्याला एका हाताने सावरत त्यांनी माझ्या कडे पाहिलं काही वेळ शांत राहीले आणि होकारार्थी मान हलवली त्यांनी...त्या तुटलेल्या चष्म्या मागचे ओलावलेले डोळे आता मला स्पष्ट दिसत होते..काय करावं हे मला आता समजत नव्हतं.. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो.. त्यांचे पाणावलेले डोळे आता गच्च भरून वाहत होते.. मला राहवलं नाही मी विचारलं
' काका काय झालं आहे ? असं नेमकं काही महत्वाचं हरवलं का , की काही पैसे वैगरे हरवले.?
गच्च भरून वाहणाऱ्या आपल्या आसवांना त्यांनी शर्टाच्या बाहुणे पुसले... गहिवरलेल्या आवाजात ते बोलले
" आज तिची शेवटची आठवण ही माझ्या कडून हरवली"
मला काही कळेचं ना.. काय करायचं ते
ते अचानक उठले.. सैरावैरा इकडे तिकडे फिरू लागले ,वेड्या सारखे एक एक दगड, एक एक वीट उचलून पाहू लागले.. ज्या वाटेवरून ते आले होते त्या वाटेवर पुन्हा ते निघाले एक एक कोपरा चाचपडून पाहू लागले. मी ही त्यांच्या मागे मागे चालायला लागलो. बराच वेळ आम्ही फिरत होतो तरी काकांना ती वस्तू भेटली नाही. शेवटी हताश होऊन ते रस्त्यावर एका कोपऱ्यावर बसेल आणि पुन्हा त्यांनी हंबरडा फोडला. त्यांची ती अवस्था बघून मला देखील गहिवरून आलं आणि मी देखील त्यांच्या जवळ जाऊन बसलो.. मी पुन्हा विचारलं
काका नेमकं काय शोधत होता.. ?
गहिवरलेल्या आवाजात ते बोलले
"सरू चा फोटो.."
काका सरू कोण ?
"बेटा! अर्धांगिनी होती माझी , सरिता नाव होतं तीच ,लाडाने सरू अशी हाक मारायचो मी तिला लग्ना आधी मुलीचा फोटो पाठवतात ना म्हणून तो फोटो तिच्या घरच्यांनी मला पाठवला होता. सरू देवा घरी गेल्या पासून एकदम काळजाशी जपून ठेवला होता पण आज तो ही माझ्या पासून दूर गेला जशी सरू कायमची दूर गेली तशी.
मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना जरा धीर देण्याचा प्रयत्न केला त्यांना.. काका नियती आहे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला पुन्हा जग सोडून जावंच लागत. प्रत्येकाचा एक ठराविक वेळ हा विध्यात्याने लिहलेला असतो . एका वेळे नंतर स्वतःला मोहपाषातून वेगळं करावंच लागत आपल्याला. माझं ते बोलणं ऐकून काका मिश्किल पणे हसले आणि बोलले 'बेटा तुझं बोलणं हे अगदी बरोबर आहे... पण एखादी व्यक्ती जर आपलं आयुष्यच बनून गेलेलं असेल तर काय करायचं?
आपला श्वास बनून गेलं असेल तर काय करायचं ? आपला प्राण बनून गेलं असेल तर काय करायचं?
अरे जगण्या साठी आपल्याला फक्त श्वासांची गरज नसते रे.! आपल्या खरी गरज असते ती आपल्या माणसांची
काका आवेगात बोलत होते पण मी शांत पणे सगळं ऐकत होतो.
काका नेमकं काय झालं होतं ,काकी कधी गेल्या ?
'काकांनी श्वास सोडला आणि बोलले आज चार वर्षे झाली सरूला जाऊन.'
काका नेमकं काय झालं होतं काकांनी ?
'ब्लड कॅन्सर झाला होता.'
माझ्या काळजाचा ठोका हा अचानक चुकल्या सारख झालं मला..
कोण होती ती सरू आणि कोण आहेत हे काका तरी सरू बद्दल ऐकल्यावर जीवाला चटका लागून गेला.
मी आता एकदम शांत झालो होतो काका एकटक माझ्या कडे बघत होते. थोडा वेळ आमच्यात काहीच संवाद झाला नाही..
मग काकांनीच बोलण्याची सुरुवात केली..
मी लहान असतानाच माझे आई वडील वारले, माझा सांभाळ नंतर काकांनी काकीनी केला . आई बाबांची माया लावली पण नियतीला काही औरच मंजूर होत..एका दुर्घटनेत काका वारेल पूर्ण घरावर दुःख डोंगर कोसळल.घरची आर्थिक परिस्थिती ही खूप ढासाळली. काकींची अवस्था मला बघवत नव्हती . घराला हातभार म्हणून मी काम करायचं ठरवलं. मिळेल ते पडेल ते काम केलं.. पण माय माऊली ती .. माझं शिक्षणावर दुर्लक्ष होतंय म्हणून काकींनी मला मुंबई ला सरकारी बोर्डिंग मधे पाठवलं. मला मुंबई ला पाठवण्या साठी त्या माऊलीने काय कष्ट घेतले असतील कोण जाणो...
काका ओघा ओघाने बोलत होते आणि मी शांत पण सगळं ऐकत होतो.
'आणि पुढे मुंबई ला आलो जीव लावून अभ्यास केला शिक्षण पूर्ण केलं आणि लगेच कामाला लागलो माऊलीच्या कष्टच फळ करायचं होतं मला आता ठरवलं की बस झालं आता आपण जरा कमावतो झालो आहोत काकीला घेऊन यायचं आता इकडे मुंबई ला तिला आणण्या साठी मी गावाला गेलो तर ती मला बोलली की माझं आयुष्य गेलं इकडे आता जीव गेल्या शिवाय या घरातून पाय निघणार नाही..
मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला तिला तरी ती काही ऐकली नाही ...
मी पुन्हा मुंबई ला वापस आलो....आणि असेच काही दिवस गेले..आणि एका दिवशी काकींची अचानक तार आली मला, की "एकदम तातडीने गावाला निघून ये.. "
मला सुचत नव्हतं की नक्की काय झालं असेल मी तसाच गावाला निघालो..
घरी पोहोचलो तर काकी शांत पण खाटेवर बसलेली होती आणि तिच्या हातात तो सरू चा फोटो होता..
तिने तो फोटो माझ्या हातात दिला आणि बोलली की ही सरिता. आंबे-वाडीतले देशमुख आहेत ना त्यांची पोरगी. तुझ्यासाठी ही मी पसंत केली आहे . तुझी काही हरकत आहे का याला ? ..मी काही काकांच्या शब्दा बाहेर नव्हतो मी होकार देऊन टाकला .
सरूचा फोटो तेंव्हा मला नीट पहात देखील आला नव्हता. सगळं कसं नंतर खूप पटापट झालं. जवळचा मुहूर्त धरला होता. अगदी साध्या पध्दतीने लग्न सोहळा पार पडला.
सरू ला पहिल्यांदा मी तेव्हा निरखून बघितल होत....
तिच्या गालावरची ती केसांची बट, तिच्या चेहऱ्यावर पडणारी ती नाजूक खळी.. तिचे ते बोलके डोळे, तिच्या ओठांच्या बरोबर वर उजवीकडे एक नाजूक तीळ. तिचा तो गोड मंजुळ आवाज...
काका एका वेगळ्याच दुनियेत गेले आहेत असं मला वाटाय लागलं... सरू काकींन बद्दल बोलतांना एक वेगळंच तेज त्यांचा चेहऱ्यावर दिसत होतं..
काका मध्येच हसले.. आणि बोलले अरे मला आधी तिच्याशी बोलताना ही खूप भीती वाटायची.. ती एवढी छान सुंदर गोंडस आणि मी हा असा गबाळ्या सारखा. काका काही वेळ त्या गुलाबी आठवणीत हरवून गेले.. मी मुद्दामून खोकल्याचा आवाज केला आणि त्यांच्या त्या समाधीचा भंग झाला, आणि काका पुढे बोलायला लागले..काय जादू होती सरू मध्ये कोण जाणे मी एवढा वेळ काकीला समजावलं होत की तू आता मुंबई ला ये राहायला पण ती आली नाही, पण सरू एकदाच बोलली तिच्याशी आणि काकी मुंबईला आली राहायला...
गुण्यागोविंदाचा संसार सुरू झाला होता आमचा.. बोलता बोलता दोन वर्षे निघून गेले .. सरू ला दिवस गेले.. आम्ही खूप आनंदात होतो, नवीन पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहत होतो खूप.. पण सात महिने झाले तरी बाळाची पाहिजे तशी हालचाल जाणवत नव्हती.. त्या काळी सोनोग्राफी ही आजच्या सारखी प्रचलित नव्हती.. सरू ची डिलिव्हरी झाली ती सुखरूप होती पण बाळ जगलं नाही... सरूला तो धक्का सहन झाला नाही , सरू पूर्ण पणे तुटून गेली होती तेव्हा.
सरू ची ती अवस्था मला बघवत नव्हती तेव्हा...मी ही आतून तुटून गेलो होतो पण मला सरू ला सावरायच होत.. आम्हाला या धक्क्यातून बाहेर यायला खूप वेळ लागला . सरू देखील आता जरा सावरली होती.. तेव्हाच एक शुल्लक आशा आजाराचं कारण झालं आणि काकी त्या आजारात गेली.. काकी गेली तो धक्का खूप मोठा होता माझ्यासाठी माऊली चा पदर पुन्हा माझ्या डोक्यावरून हरवला होता.. सरू ने खूप जिकरीचे मला सावरलं तेव्हा.. सरू कधी सखी झाली माझी तर कधी माय माऊली झाली माझी...
नंतर बराच प्रयत्न करून ही सरूला गर्भ राहिला नाही तेव्हा ही ऐश्वराचीच इच्छा आहे असं मानलं आम्ही.. आता फक्त एकमेकांसाठी जगायचं.. हे ठरवलं आम्ही.
आम्ही जणू एक जीव झालो होतो.. सरू श्वास जीव प्राण झाली होती.. तीची सवय नाही तर तिची सोबत ही गरज झाली होती माझी..
जीवनात नंतर ही खूप चढ उतार आले पण सरू खंबीर पणे सोबत उभी राहीली होती माझ्या..
असेच काही वर्ष गेले ..
सरू अचानक आजारी पडायला लागली.. तीच वजन हे पटापट कमी व्हायला लागलं.. मी तसाच तिला हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट केलं..
तिला कॅन्सर झाला आहे असं निदान डॉक्टरांनी केलं.
माझ्या पाया खालची जमीन सरकली..
सरू आता एकमात्र जगण्याचा सहारा उरला होता माझ्या आयुष्यात.
काकांचे डोळे पुन्हा भरून आले.. पुन्हा ते गहिवरून गेले...
मी जरा शांत केलं त्यांना
काका पुढे बोलले
' मी खूप लढलो ,खूप पर्यत केला, होत नव्हतं ते सगळं पणाला लावल पण सरूला नाही वाचू शकलो मी आणि काकांचा पुन्हा तोल गेला. मी कस बस त्यांना सावरलं..
काका पुढे बरच काही बोलत होते आणि मी फक्त ऐकत होतो..
बराच वेळ आम्ही बसलो होतो तिकडे.. आता अंधार देखील पडायला लागला होता. आम्ही आता जायला निघालो . मी काकांना बोललो की काका तुम्हाला सोडायला येऊ का मी ? आता खूप वेळ देखील झाला आहे..
काका प्रेमाने बोलले "नको बेटा तुला देखील वेळ झाला असेल, आता तू देखील घरी जा माझी काळजी करू नकोस मी जाईल बरोबर घरी...."
ठीक आहे असं म्हणत मी काकांचा निरोप घेतला आणि घरच्या दिशेने निघालो...
खूप काही चाललं होतं तेव्हा माझ्या मनात एकदम साध्या साध्या प्रॉब्लेम ने आपण किती बेचैन होऊन जातो पण लोकांच्या आयुष्यात किती दुःख असतात. त्यांच्या दुःखा समोर आपलं दुःख तर कवडी मोल पण नाही.
आता पूर्ण अंधार पडला होता.. तरी मी त्या तळ्याकडे गेलो....आणि पुन्हा त्या कट्टयावर जावून बसलो.
आतून खूप बेचैन वाटत होतं. मला काही सुचत नव्हतं, वातावरनातं एक उदासी जाणवत होते.
तेवढयात वाऱ्याची एक झुळूक आली.. आणि एक जाडसर कागद माझ्या पाय जवळ येऊन पडला.. माझी सवय आहे की कोणताही कागद मी माझ्या पायाखाली येऊ देत नाही, म्हणून मी तो कागद उचलून बाजूला करण्यासाठी हातात घेतला . तो एक फोटो होता. मी रस्त्या वरच्या दिव्याच्या उजेडात तो फोटो घेऊन गेलो तर तो एका सोळा सतरा वर्षांच्या मुलीचा ब्लॅक अँड वाईट फोटो होता.. गालावर आलेली ती केसांची बट, चेहऱ्यावर पडलेली तो गोड खळी आणि ओठांच्या वर अगदी उजव्या बाजूंला तो नाजूकसा तीळ... अरे हा तर सरू काकींचा फोटो असावा.... मी धावत पळत तसाच काका बसले होते त्या जागेवर गेलो .. पण काका आता तिकडे नव्हते मी त्यांना पुढे बराच शोधण्याचा प्रयत्न केला पण काका मला दिसलेच नाही... माझ्या समोर एक गृहस्थ आले त्यांनी मी विचारलं की असा असा दिसणारा सुमारे या या वायाचा माणूस इकडे जवळ पास राहतो का... तर त्यावर ते गृहस्थ बोलले की अस कसं सांगता येईल त्यांचं नाव तरी माहिती असायला हवं पाहिजे होत की नाही.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की एवढा वेळ आपण काकांन सोबत बोलत बसलो होतो तरी त्याचं नावच विचारलं नाही.. की ते कुठे राहतात हे देखील विचारलं नाही
मी डोक्याला हात लावला , माझा मूर्ख पणा लक्षात आला होता मला..
मी आज देखील तो फोटो घेऊन रोज जातो त्या तळ्या कडे, की ते काका मला पुन्हा भेटतील या आशेने त्यांना त्यांची हरवलेली सरू पुन्हा वापस देण्यासाठी.. सतिष अहिरे
fabulous..love you
ReplyDeleteThanks dear
Deleteखूप छान गोष्ट आहे
Deleteछान लिहितोस! कितीही गरिबी असू दे पण प्रेमळ सहवास हेच जीवनाचं सर्वस्व असले की माणसं उमेदीने जगतात अन्यथा कोलमडतात ! तुझ्या पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा !
ReplyDelete------------ संजय पाटील सर , पनवेल ----
तुमचे खूप खूप आभार सर
Deleteछान लिहिलं आहे
ReplyDeleteथँक्स आई
Deleteबोहोत खूब
ReplyDeleteलिहिण्याची पद्धत प्रवाही आहे
ReplyDeleteलिहीत रहा
खूप खूप आभार तुमचे माधुरी जी
DeleteMast
ReplyDeleteतुमचे खूप खूप आभार
Deletekhupach chaan.
ReplyDeleteWordings, Ultimate!
Thanks dada
DeleteNice story..realy heart touching.....
ReplyDeleteतुमचे खूप खूप आभार पूजा जी
Deleteथँक्स पूजा जी
DeleteAati sundar
ReplyDeleteतुमचे खूप खूप आभार साधना जी
Deleteखूप छान विचारांतीन मांडला आहेस तू ही गोष्ट.
ReplyDeleteखूपच छान.
थँक्स राकेश गजल वेतरिक्त हे लिखाण देखील करून बघिल लोकांना खूप आवडतंय छान रिप्लाय येतात सगळ्यांचे
Deleteखूपच छान.. हळवे क्षण...
ReplyDeleteअमोल जी खूप खूप आभार तुमचे
DeleteHeart touching.......
ReplyDeleteThanks dear
Deleteखुप छान कथा आहे... आयुष्याच्या अशा एका वळणावर एका सोबतीची खुप गरज असते आणि पत्नीची साथ ही अशी असते की आपल्याला त्या एका वयात ती आपले पूर्ण जग असते
ReplyDeleteसुरेश जी आपलं खूप खूप आभार .हो बरोबर आहे
DeleteWa khup chan
ReplyDeleteThanks dear
DeleteKupch chan
ReplyDeleteThanks dear
DeleteApratim Satish👍 shevat jari manala chatka lavun janara asla tari kathela matra paripurna sajesa aahe. Khup sundar likhan aahe.
ReplyDeleteआपले खूप खूप आभार
Delete