Sunday, 26 April 2020

हुंदका

बराच वेळ झाला तरी विराज अजून घरी आला नव्हता.  वसुधाला विराजची खूप चिंता वाटत होती.  सूर्य आता  मावळायला लागला होता. संध्याकाळचा मंद वारा अंगाला झोंबत होता. वसुधा विराजला पाहण्या साठी सारखी आता-बाहेर करत होती. शेवटी हताश होऊन ती ओट्यावर येऊन बसली. अंगणात सुकलेल्या पानांचा सडा पडला पडलेला होता . बाहेर नितांत अशी शांतता होती. दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हतं. तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं.
 आमच्या लग्नाला तीस वर्षे पूर्ण झाले. ते नेहमी मला सांगूनच घराच्या बाहेर जायचे आणि वेळेत घरी परत यायचे. या तीस वर्षात त्यांनी कधीच आपला दिनक्रम बदला नव्हता. पण आज मात्र ते खूपच विचित्र वागले .
मला सकळी दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि चटकन जाग आली. पाहते तर काय , यांनी माझ्या आधी उठून सगळं आवरलं होत आणि ते कुठेतरी जायला निघाले होते.
मी त्यांना विचारलं .
" आहो कुठे निघालात." 
तरी ते मला काही बोलले नाही , तशीच त्यांनी आपली सायकल काढली आणि न बोलताच  निघून गेले.आता बराच वेळ होऊन गेला होता. सूर्य  देखील आता मावळला होता. सगळी कडे अंधार पसरला होता तरी विराज अजून आला नव्हता. जरा कसली चाहूल लागली तरी वसुधाला विराजचा भास होत होता. वसुधा आता खूपच बैचेन झाली तिच्या मनात ना- ना प्रकारचे विचार यायला लागेल होते . ती स्वतःलाच प्रश्न विचारायला लागली.
" हे आज असे का वागेल असतील ?" 
" नेमकं काय चाललं असेल यांच्या मनात"? 
" यांनी स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर.? या विचारांनी वसुधा आता खूपच बैचेन झाली.. तिला नेमकं  काय करायचं हे कळत नव्हतं. 
वसुधाचा उर  भरून आला आणि तिच्या डोळयात एकदम टचकन पाणी आलं..
वसुधा पाणावलेल्या डोळ्यांनी विराजची वाट बघायला लागली.
थोड्या वेळाने तिला सायकलचा आवाज आला. ती धावत - पळत. अंगणातल्या गेट जवळ आली .. तिला दुरून  विराज येताना दिसला. विराजला पाहून तिचा जिवात - जीव आला.. वसुधाने पदराने आपले डोळे पुसले..आणि  ती तिथेच उभी राहिली.
विराज अंगणात आला तरी  तो वसुधाशी  काही बोलला नाही .
वसुधा आता खूपच वैतागली  आणि  रागाच्या भरात बोलायला लागली.
" आहो कुठे गेले होते  सकाळ पासून "? 
" तुम्ही बोलत का नाहीये माझ्याशी ".
" तुम्हाला नेमकं काय झालं आहे ." 
विराज तरीही  वसुधाशी काहीच बोलला नाही.. तो घरात जायला लागला . वसुधा आवेगाने विरजच्या जवळ आली आणि बोलली 
" आहो , आता काय जीव घेणार आहेत का तुम्ही माझा "?
" बोलना काहीतरी !
विराज ने वसुधाच्या डोळ्यात बघितलं आणि क्षणात आपली नजर झुकवली.
आपल्या हातातली पिशवी त्याने वसुधाच्या हातात दिली आणि तिला बोललं.
" वसुधा  खाऊन घे काही , सकाळ पासून तू काहीच खाल्लं नसणार" आणि घरात निघून गेला.
वसुधाने पिशवी उघडून बघितली त्यात शिळ्या भाकरी होत्या आणि एका डब्यात आमटी होती.
 वसुधा मग  घरात आली. तिने मांडणी वरून ताट काढलं आणि त्या शिळ्या भाकरी ताटात काढून घेतल्या. हंड्यातून पाण्याच्या तांब्या भरून घेतला आणि विरजच्या बाजूला येऊन बसली. विराज अजूनही गप्पचं होता तो  खिडकी कडे एकटक पाहत काही विचार करत बसला होता.. वसुधा त्याला बोलली .
" आहो,  तुम्ही पण जरा काही खाऊन घ्या ना .मला माहित आहे तुम्ही पण अजून काही खाल्लं नसणार ". 
विराजने वसुधाकडे  शून्य नजरेने पाहिलं.. आणि बोलला.
" मला भूक नाही ये."
" आहो,  तुम्ही जर काही खाल्लं नाही  तरी  एक साधा घास तरी जाईल  का मला".
" आहो ,खाऊन घ्या ना जरा." 
" तुम्हाला माझी शप्पथ आहे.!"
वसुधाने घास घेतला आणि ती विराजला भरवायला लागली.  नाही -नाही  म्हणत  विरजने तो घेतला , कारण विराजचा आता नाईलाज झाला होता . वसुधाने त्याला आपल्या शप्पथ देऊन अडकवल होत.
आता विराज पण वसुधाला भरवायला लागला होता.. त्यांनी एकमेकांन कडे पाहिले.. आणि भारावून गेले.. थोड्या वेळा साठी त्यांना सगळ्या जगाचा , दुःखाचा विसर पडला.
काही वेळात मग त्यांनी जेवण उरकलं. वसुधाने घर आवरायला घेतलं.. विराजने गोधडी अंथरली आणि अंथरुणावर पडला. वसुधा पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तो तिने विराजच्या उशाशी  ठेवला आणि अंथरूणावर पडली..
काही वेळसाठी कोणीच काही बोललं नाही. पण शेवटी वसुधाला राहवलं नाही आणि तिने विराज ला प्रेमाने विचारलं.
" आहो बोलना नक्की काय झालं आहे."
विराज खूप गंभीर झाला आणि बोलला.
" वसुधा आज हरलो मी". 
" सार काही संपलं !"
वसुधा गहिवरलेल्या आवाजात बोलली
" आहो असं का बोलताय"
" वसुधा या पोटच्या आगी पाई आज मी एवढा वर्ष कमावलेली इज्जत- मानमर्यादा आत्मसन्मान सगळं विकून आलो" 
विराजचा भावनांचा बांध आता फुटला होता ..एखादा पत्यांचा बंगला जसा कोसळावा तास विराज वसुधा समोर कोसळून पडला. .. विराज ने जोरात हंबरडा फोडला आणि तो रडायला लागला... वसुधाने त्याला एकदम गच्च मिठी मारली. विराजची ती अवस्था बघून वसुधाला ही कसतरीच झालं. ती ही मग वेड्या सारखी रडायला लागली.
विराज ने वसुधला रडतांना बघितलं आणि तो भानावर आला..त्यांनी ही वसुधला मग गच्च मिठी मारली.. बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत रडत होते.
काही वेळाने दोघेही शांत झाले. मग विराज बोलायला लागला
" हे  असं किती दिवस चालणार".? 
" महिना झाला तरी सगळा देश बंद करून ठेवला आहे यांनी".
वसुधा धीर देत बोलली 
" आहो हे दिवस पण जातील "
" हा रोगच आसा आलाय की त्याला कोण काय करु शकतं .. रोज किती तरी माणसे मरताय त्याने.
विराज खूप बैचेन होऊन बोलला 
" वसुधा जग जरी थांबलंना तरी पोटाची आग काही केल्या थांबत नाही, हे कळत कसं नाही लोकांना..आग आपल्या सारख्या हातावर पोट असणाऱ्या माणसाने जगायचं तरी कसं. या कोरोनाने मरण्या आधी कित्येक लोक भूकेने मरतील.
वसुधा चिंतेच्या स्वरात बोलली
" हो बरोबर बोलताय तुम्ही , कसं तरी चार घरच भांडी धुवायचे काम मोठ्या मुश्किलने मला भेटलं होत. घराला थोडाफार तरी हातभार लागत होता . पण महिना सगळं काम बंद आहे .या वयात आता दुसरं काही काम पण करता येत नाही मला  .
" पण सगळं ठीक होईल. देव आपली परीक्षा बघतोय.." 
विराज वैतागून बोलला .
" देवा तुझ्या हृदयाला पाझर तरी कधी फुटेल रे.. की तेही दगडा सारखा झालं आहे तुझ्या मूर्ती प्रमाणे.
वसुधा धीराने पुन्हा बोलायला लागली 
" या आधी ही आपल्यावर किती संकट आली पण तुम्ही किती धीराने त्याला सामोरे गेलात.
विराज खूप बैचेन झाला आणि उठून बसला  पुढे हताश होऊन  बोलायला लागला 
" वसुधा या मनगटात अजून खूप ताकद आहे .पण हाताला कामच नाही .. मी काय करू आता मला काहीच कळत नाही ये.
वसुधा ही आता  उठली तिने विराजच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलायला लागली 
" मी काही ओळखत नाही का तुम्हला.. तुम्ही आता पर्यंत एवढ्या हिंमतीने सगळं केलं.. घरच्यांचं आजार पण  मुलाचं शिक्षण सारंच काही तुम्ही केलं  मला वाटलं होतं की आपला मुलगा आधार होईल आपला पण काल आलेल्या पोरीच्या मोहात पडून त्यांने वेगळा संसार थाटला..
आई - बापाला विसरला तो.
विराज रागात बोलला 
" नाव काढू नको त्याच!" 
" हो , हो नाही काढत त्याच नाव पण तुम्हाला आठवत का तेव्हा मी किती खचून गेले होते . तुम्हीच मला सावरलं होते तेव्हा.
" तुम्ही मला काय बोलला होता तेव्हा लक्षात आहे का तुमच्या? 
" हो आहे लक्षात." 
" काय बोलला होतात ? "
" तुझा माझ्यावर विश्वास आहे का  ? 
" हो आणि मी तुम्हाला काय उत्तर दिलं होतं तेव्हा" 
" तू बोलली होतीस ," माझा तुमच्यावर माझ्या पेक्षाही 
वसुधाने आपला हात विरजच्या ओठावर ठेवला ,त्याला गप्प केलं आणि बोलायला लागली
" माझा तुमच्यावर माझ्या पेक्षाही खूप जास्त विश्वास आहे आणि आज ही मी तुम्हाला तेच बोलते आहे की माझा तुमच्यावर माझ्या पेक्षा ही  खूप जास्त विश्वास आहे , मला खात्री आहे की तुम्ही सगळं ठीक कराल . तुम्ही सोबत असलात की मला कसलीच चिंता नाही कसलीच फिकर नाही. 
विराज चिंतेच्या स्वरात बोलला
" वसुधा तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे." 
वसुधा विश्वासाने बोलली .
" परिस्थिती कशी ही असो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.
का धीर सोडता."
" या वयात ही तुम्ही पडेल ते काम केलं. अगदी सकाळी पेपर टाकण्या पासून ते दुधाच्या पिशव्या पोहोचवण्या पर्यंत सगळं तुम्ही केलं.. त्याच्यानेही घर खर्च निघत नाही म्हणून हॉटेलात नोकरी केली ..लोकांचं उष्ठ- खरकट्ट काढलं..राब- राब राबला पाई- पाई जोडत गेलात.. आणि आपली एक छोटीशी चहाची टपरी टाकली.." 
"  सगळं कसं ठीक चाललं होतं .बाकी काही नाही पण आपल्याला पुरेल एवढा तरी पैसा येतं होता..मी ही कामाला जात होते त्याचा ही जरा हात भार लागत होता.
विराज ने होकार भरला आणि तो पुन्हा शांत झाला
वसुधाने विचारल
" आहो आज नक्की काय झालं तुम्ही सांगितलंच नाही मला. 
विराज गहिवरलेल्या आवाजात बोलला
" वसुधा नको विचारू काही मला झोप आता." 
" जर तुम्ही मला काही सांगितलं नाही तर मला झोप तरी कशी लागेल.. तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि मला काहीच कसं कळतं नाहीये..
" वसुधा तुला माहीत आहे , मला खोटं नाही बोलता येत तुझाशी ..
" हो माहीत आहे मला " . आहो सांगना मला काय झालं ते नाहीतर झोपच नाही लागणार मला सारख तेच ते डोक्यात चालत राहील".
विरजने स्वतःला जरा सावरलं धीर एकवटला आणि बोलायला लागला 
" वसुधा तू जरी मला काही सांगितलं नाही तरी मला कळत सगळं. आठवडा झाला घरात अन्नाचा दाना नाही ये .सुरुवातीला लोकांनी मोठ्या मनाने मदत केली पण बरेच दिवस आता कोण आपल्याकडे फिरकल नाही .म्हणून आज लाज शरम सगळी  बाजूला ठेवून मी जेवढ्या लोकांना ओळख तो त्या सगळ्याकडे गेलो,  काही खायला भेटत की ते मागायला नाहीतर काही किराणा भेटतो का ते मागायला.पण रोज मरे त्याला कोण रडे ही गत झाली. ओळखीची लोक अनोळखी सारखी वागत होती. बऱ्याच लोकांकडे तर जाता पण आलं नाही  कारण गल्ल्या बंद होत्या. काहींची आपल्या सारखीच अवस्था होती.. दिवसभर खूप फिरलो तरी काही भेटलं नाही..
शेवटी लाज शरम सगळी बाजूला ठेवून मारुतीच्या मंदिराच्या बाहेर भीक मागणाऱ्याच्या लाईन मधे जाऊन बसलो.. आधी मला भीती वाटत होती कोणी ओळखीच्या ने बघितलं तर काय होईल पण नंतर  पोटाची आग आतून आवाज देत होती . लाज -शरम, मान सन्मान ,स्वाभिमान यांच्यावर पाणी टाकून मी  तिकडे भीक मागत बसलो..बऱ्याच  वेळाने तिकडे एक भली मुलगी आली आणि  तीने ती भाकर आणि आमटी दिली. मी तसाच मग घरी परत आलो. मला माहित होतं की तू ही सकाळ पासून उपाशी आहेस..
विराजचा तोल पुन्हा गेला आणि तो ढसा ढसा रडायला लागला..
विराजच बोलणं ऐकून वसुधा एकदम सुन्न झाली..तिला खूप मोठा धक्का बसला  होता .. तिचा  ही तोल गेला ती चटकन उठली आणि दरवाजा उघडून बाहेर आली .. आपलं पदर तिनी तोंडाशी गच्च बांधला आणि ती रडायला लागली..बाहेर 
 नितांत अशी शांतता होती..आणि आता फक्त त्या दोघांच्या हुंदक्यांचा आवाज वातावरणात घुमत होता.
                                       .....  सतिष अहिरे

34 comments:

  1. Replies
    1. Thanks dear for your valuable feedback and support

      Delete
  2. अतिशय सुंदर कथा.मनाला स्पर्श करणारी

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे खूप खूप आभार

      Delete
  3. नेहमीप्रमाणे ओघवत्या शैलीतील कथा खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे खूप खूप आभार

      Delete
  4. कथा फारच छान आहे एक सूचना आहे
    शांतता नितांत म्हणत नाहीत निरव शांतता असे लिहितात
    डॉ अविनाश पाटील . '

    ReplyDelete
    Replies
    1. ठीक आहे काका तुमचे खूप खूप आभार

      Delete
  5. भावपूर्ण निर्मिती

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे खूप खूप आभार

      Delete
  6. Replies
    1. तुमचे खूप खूप आभार

      Delete
  7. Replies
    1. तुमचे खूप खूप आभार

      Delete
  8. Heart touching Satish. Ek kshan mann sunn karun gela shevat.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे खूप खूप आभार

      Delete