Thursday, 6 January 2022

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर

 डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्हात बागणी गावात झाला होता आणि मृत्यू एप्रिल २०, २००८ पुण्यात झाला होता. त्या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्‍या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.
 
   त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास, लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन इत्यादी कामे त्यांनी पार पाडली होती .

सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला चिं.ग. कर्वे हे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच सन 1958 मध्ये नियोजन आयोगाच्या शिक्षण विभागाच्या शिफारसीनुसार दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्त्री शिक्षणासंबंधीच्या आयोगाच्या त्या सचिव होत्या.

सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम होती. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. त्या अत्यंत उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.


डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या पुढील प्रमाणे आहे
अजिता (१९५३),आठवतंय तेवढं सांगते (१९५५),इथं गोष्ट संपली, कमळाचं जाळं (१९४६)
तू भेटायला नको होतास, स्वयंवर (१९७९), हिरवा चुडा

कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह पुढील प्रमाणे 
आमची गाणी, काळी मखमल, कुलाचार, खिरापत, खुणेची पाने, गुलाबकळी, ग्रामलक्ष्मी, चंद्राची भारजा, चिंचेची ,पत्रावळी, झालं गेलं सांगते, डोंगरची मैना, देवदर्शन, धरित्रीच्या लेकी, नवलाख तारांगण, नवलाखी हार, नव्याची पुनव, निरशा दुधाची घागर, निळे डोळे, पाटपाणी, भांगातुरा,भिंगरी, भूक लाडू तहान लाडू, मंगलाक्षता, महिला मंडळ, मानवी प्रवास, माहेरचा चंद्रमा, माझ्या घरची, मुक्तांगणं, यशोधरा, राधाई, राही रुक्मिणी, रुखवत, सुशोभन, स्थित्यंतर, स्वारी सुखात आहे.

  डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर याचे पप्रकशित झालेले काव्यसंग्रह . चाफेकळी, झोळणा (१९६४) हे आहेत.
  
  महिलांविषयक हे त्यांचे पुढील साहित्य आहे 
  मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत (१९६१)
  स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  स्त्रीशिक्षणाची वाटचाल 
  बालवाङ्मय मधे काचेची पेन्सील, जम्माडी जम्मत : भाग १ आणि २, बालनाटिका : भाग १ ते ४, भारतीय स्त्रीरत्‍ने भाग १ ते ४ इत्याती आहेत .
  
 माझ्या खुणा माझ्या मला हे त्यांचं आत्मचरित्र आहे 

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी संपादित केलेले पुस्तके 
आदिवासींचे सण-उत्सव, एक होता राजा, कारागिरी, कुलदैवत, छंद माझा आगळा, जनलोकांचा सामवेद, जाई मोगरा, जा माझ्या माहेरा, तीर्थांचे सागर, दसरा दिवाळी, नंदादीप, नादब्रम्ह, बाळराजे, भोंडला भुलाबाई
महाराष्ट्र लोकसाहित्य माला : ए्कूण ५ भाग
मी पाहिलेले यशवंतराव (१९८८), रांगोळी, राजविलासी, केवडा, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती - संमेलन वृतांत, लोकसाहित्य - भाषा आणि संस्कृती, लोकसाहित्य :, शब्दकोश, लोकसाहित्य साजशिणगार, वसंतदादा गौरव, ग्रंथ, वैजयंती, श्रावण भाद्रपद, समाज शिक्षण माला(नियतकालिक) (१९५० पासून), सांगीवांगी, स्त्रियांचे खेळ आणि गाणी इत्यादी आहेत 

आणि त्यांनी सहसंपादित केलेली पुस्तके ही पुढील प्रमाणे आहेत .
इयत्ता ७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : डॉ.वि.म.कुलकर्णी).
सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी

भूषविलेली पदे संपादन करा
१९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
१९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
१९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य

सन्मान व पुरस्कार संपादन करा
२५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.
५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
७ सप्टेंबर १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
२६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
१० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
२३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गौरव
मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार
जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यात डॉ.सरोजिनी बाबर यांचा सत्कार करण्यात आला.
१ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
१२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
२७ डिसेंबर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.

अशा थोर विचारवंत आणि साहित्यिक केला माझा कोटी कोटी प्रणाम जाता जाता त्यांची एक कविता खास आपल्यासाठी 

अडगूळ मडगूळ सोन्याचं कडबुळं
खेळायला आलं गं , लाडाच डबुलं

गालात हसून ,ओठात बोलून
हातानं खेळत काय ग म्हणाल

जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं 
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं

रांगत रांगत , हअम डौलत
 गुढग्यावर रेलून काय ग पाहिलं 

फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून 
कारंजं उडवीत कसं ग रागावलं

झेप झेपावून तोल सारून
नाचून नाचून पाय खुळखुळलं 

काजळ तितीट बाळाच्या मुठीत
माझ्या जीवचं सुख दाटलं 


  ( सतिष अहिरे ) 

3 comments: