काही मनातलं
एका लेखकाच्या मनाची अवस्था ओळखणं खूप कठीण असतं. लेखक मुळातच खूप संवेदनशील असल्या कारणाने कोणत्या घटनेचा त्याचा मनावर काय परिणाम होईल हे सांगता येन खूप कठीण आहे. नेमकी कोणती गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली आहे ,कोणत्या गोष्टीसाठी त्याच मन बेचैन झालं आहे ,कोणती गोष्टी मुळे तो अस्वस्थ झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे.
दुसऱ्या कोणाच्या मनाला एकदम सामान्य वाटणारी गोष्ट पण लेखकाच्या मनावर खूप परिणाम करून जाते. त्याच्या मनात विचारांचं मग मंथन तयार करून जाते आणि ते समुद्र मंथना पेक्षा ही खूप 'अफाट 'असतं 'विराट' असतं, कधी त्याच्यातून जीवन संजीवनी देणार अमृत बाहेर पडत तर कधी या सुष्टीचा अंत करणार हलाहल बाहेर पडत. एक आग लागते बस त्याच्या तना-मना मधे आणि तो रोजच जळत असतो त्यात....... सतिष अहिरे
No comments:
Post a Comment